मुंबई : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्यामुळेच झाला. असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून देवेंद्र फडणवीस असत्याचा आधार घेऊन विधान करत आहेत. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी होत असून ट्विटवर देखील ट्विटवार रंगलं आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना फडणवीसांवर टिका केली आहे.
हेही वाचा..चिंचवडमध्ये मतविभाजनाची धास्ती, राहुल कलाटे भाजपची की आघाडीची मतं घेणार? जोरदार फिल्डिंग
सुंस्कृत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला खुप अपेक्षा होती. मात्र त्यांनी आमचा अपेक्षाभंग केला आहे. तसेच आम्हाला एक गैरसमज झाला होता की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात विकासावर बोलून ते मुख्यमंत्री झालेत. परंतु आता विकास सोडून राज्यात भलतचं काहीतरी सुरू झालं आहे. अशी खोचक टिप्पणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हेही वाचा..“भाऊ तुम्ही अमर आहात, एक मत आपल्या अश्विनीताईंना,” महेश लांडगेंनी मतदारांना केलं भावनिक आवाहन
एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांची सध्या दिल्लीची वारी जास्त वाढली आहे. सध्या राज्य सरकारने केलेले काम म्हणजे बाकीच्या राज्यांना आपले प्रकल्प देणे, महागाई वाढवणे, स्वत:च्या प्रसिद्धीसाठी लाखो करोडो रूपये खर्च करणे, इतकंच मागच्या सहा ते आठ महिन्यात झालं आहे. मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाहीत. एकाएका मंत्र्यांकडे सहा सहा खाती आहेत. ह्या सर्व जबाबदाऱ्या कशा संभाळणार? असा खोचक सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
Read also
- हेही वाचा..“शिंदे फडणवीस सरकारचं आजचं मरण उद्यावर जाऊ शकत, परंतु सरकारचा अंत अटळ”
- हेही वाचा..” पोटनिवडणुकांसाठी राजकारणातील भाजपचा चाणक्य पुण्यात येणार, विरोधकांमध्ये भरली धडकी”
- हेही वाचा..“निवडणुकीत आपलाच विजय व्हावा,” हेमंत रासनेंसाठी भाजपची कोअर कमिठी अलर्टं मोडवर
- हेही वाचा..“शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी, बंडखोर आमदार भाजपमध्ये जाणार ?”
- हेही वाचा..“तर तुम्ही रोज बदाम खा, पहाटेच्या शपथविधीवरून ट्विटवर रंगलं, राष्ट्रवादी अन् भाजप ट्विटवार”