मुंबई : कालपासून सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शिंदे गटातील वकिलांनी आतापर्यंत सगळ्याच घटनांवर युक्तिवाद केला आहे. राज्यपाल, 16 अपात्रतेची याचिका, उपाध्यक्षांवरील अविश्वासाचा ठराव, या सगळ्याचं मुद्यावरून फैरी झाडण्यात आल्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय दोन्ही गटाचं ऐकून आपला निर्णय जाहीर करेल. असा विश्वास वकिल उज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे. त्यातच काल आणि आज देखील सर्वोच्च न्यायालयात दोन्ही वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. त्यामुळे या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
हेही वाचा..मोठी बातमी..! शिवजयंतीच्या आधी भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार?
विधीमंडळातील सदस्यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार संविधानानुसार विधानसभा अध्यक्षांना आहे. मात्र घटनेच्या वेळी विधानसभा अध्यक्ष नसल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बंडखोर आमदारांना एक नोटीस पाठविली होती. त्याच वेळी 22 जुन रोजी शिवसेनेच्या आमदारांनी नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर 23 जुनला तुमच्यावर अपात्रतेची कारवाई का करू नये. अशाप्रकाराची नोटीस पाठविली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली. त्यानंतर त्याचं कामकाज पुढे होऊ शकलं नाही. या सगळ्या फेरीमध्ये सर्वोच्च न्यायालय प्राथमिक मुद्दा बाहेर काढण्याची शक्यता आहे. असं मत वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा..“BBC ने डॉक्युमेंट्री काय बनवली, तर लगेच त्यांच्यामागे आयटी चा ससेमिरा”
यातच आता 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई, त्यातच उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव, यामधून सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार ते महत्वाचं आहे. या संपुर्ण प्रकरणाची सुनावणी पाच खंडपीठाच्या न्यायाधीशांने सुरू केली आहे. त्यामुळे हे प्रकरण सात खंडपीठाकडे जाणार असं मला वाटत नाही. त्यात नबाब रूबीया प्रकरणाचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे. त्याची मागणीही एका गटाने केला आहे. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाचं भाष्य नाही. परंतु सगळे मुद्दे त्यामुळे सर्वोच्च न्यायालय दोन्ही गटाचं ऐकून आपला निर्णय जाहीर करेल. असंही उज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
Read also
- “भाजपचे पतन थांबवण्यासाठी मोदीला महिन्याला राज्यात येऊन पोळ्या लाटाव्या लागताहेत”
- हेही वाचा..““मनसेने रासनेंना पाठींबा दिल्यामुळे धंगेकरांचे टेन्शन वाढले, मनसेच्या पाठींब्यामुळे रासने सेफ झोनमध्ये”
- हेही वाचा..“कसब्यात नियोजन व प्रचारात भाजपची आघाडी; भाजपचे मंत्री हेमंत रासनेंसाठी एकवटले
- हेही वाचा..““चार महिन्याआधी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं, आता पुन्हा भाजपमध्ये, त्या नेत्याची सर्वदुर चर्चा”
- हेही वाचा..““फडणवीसांना जे बोलता येत नाही, ते बोलायला कोकणातील कोंबडी चोर भाड्याने ठेवलेत?”