मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिलीत. तर दुसरीकडे शिवसेनेतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. याचा मोठा फटका बसत असतांना इतर पक्षातील नेते ठाकरे गटात देखील प्रवेश करताहेत. यातच चार महिन्यापुर्वी भाजप सोडून शिवसेनेत आलेल्या भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्याची सध्या एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा..“शिंदे फडणवीस सरकारचं आजचं मरण उद्यावर जाऊ शकत, परंतु सरकारचा अंत अटळ”
धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे चिरंजीव तथा युवा सेनेचे सहसचिव यशवर्धन कदमबांडे यांनी २० ऑक्टोबर रोजी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन हाताला शिवबंधन बांधलं होतं. परंतु आता कौटुंबिक कारणामुळे त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा..” पोटनिवडणुकांसाठी राजकारणातील भाजपचा चाणक्य पुण्यात येणार, विरोधकांमध्ये भरली धडकी”
यशवंत राजवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या खांद्यावर युवासेनेचे सहसचिव पदाची जबाबदारी दिली. आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र यानंतर य़शवंत कदमबांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने धुळे जिल्हा शिवसेनेला राजकारणातील मातब्बर चेहरा मिळाला असल्याने मोठी चर्चा सुरू झाली. यातच आपल्या वडिलांमुळे चार महिन्यांच्या प्रवासानंतर आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Read also
- हेही वाचा..““फडणवीसांना जे बोलता येत नाही, ते बोलायला कोकणातील कोंबडी चोर भाड्याने ठेवलेत?”
- हेही वाचा..मोठी बातमी..! शिवजयंतीच्या आधी भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार?
- हेही वाचा..“BBC ने डॉक्युमेंट्री काय बनवली, तर लगेच त्यांच्यामागे आयटी चा ससेमिरा”
- हेही वाचा..“..तर उद्या संपुर्ण देश खावून टाकेल”, उद्धव ठाकरेंची मोदींवर जहरी टिका
- हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती,” त्यामुळे सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना