पुणे : थोर समाजसुधारक राष्ट्रसंत सेवालाल महाराजांच्या २८४ व्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हिजेएनटी सेलमार्फत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते राष्ट्रसंत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर व्हीजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांनी सेलच्या उपक्रमांचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासमोर प्रास्ताविक स्वरुपात मांडला. तसेच व्हिजेएनटी सेलच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा..““राष्ट्रीय समाज पक्षाची पुर्ण ताकद हेमंत रासनेंना देणार, विजयी गुलाल उधळणार”, महादेव जानकर
जयंतराव पाटील म्हणाले की, या कार्यक्रमातून संत सेवालाल महाराजांना आदरांजली वाहण्याची संधी आम्हाला मिळाली. महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे. जेव्हा एखादी थोर व्यक्ती जन्माला येते तेव्हा ते त्या समाजापुरते मर्यादित राहत नाहीत. ते जगाचा विचार करतात म्हणून सर्व जातीधर्माचे लोक त्यांना संत म्हणून त्यांचे महात्म वाढवतात. व्यापारानिमित्ताने भारतभ्रमण करताना संत सेवालाल महाराजांनी अनेक संतांविषयी माहिती मिळवली. त्यातून सत्याचा शोध आणि बोध घेण्याचा त्यानी खरा मार्ग दाखवला. त्यामुळे संत सेवालाल महाराजांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली वाहताना भटक्या विमुक्त जाती जमातीला एकत्र करण्याचा विचार आपण अधिक प्रकर्षाने करणे आवश्यक आहे. या निमित्ताने जयंतराव पाटील यांनी २००३ च्या अर्थसंकल्पाची आठवण करून दिली.
हेही वाचा..“गुवाहाटीला जाण्यानं मंत्रालय झालं असेल तर अजून दोनदा गुवाहाटीला जाऊ”, बच्चू कडू
अर्थमंत्री पदाची जबाबदारी पार पाडताना अर्थसंकल्पात भटक्या विमुक्त जाती जमातींपैकी ५३ जातींची नावे बजेटच्या अधिकृत भाषणात वाचून काढत या समाजासाठी आमचे बजेट आहे हे दाखवून दिले. या सर्व समाजाकडे लक्ष दिल्याशिवाय भारताची सुधारणा होणार नाही असे ते म्हणाले. यासाठी पक्षाच्या व्हिजेएनटी सेलने राज्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यक्रम घेण्याची अपेक्षा प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.
हेही वाचा..“पोटनिवडणुकांसाठी सगळी प्रचार यंत्रणा कामाला लागलीय, विजय आमचाच”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
या समाजातील सुशिक्षित लोकांना पुढे आणून नव्या पिढीला संधी देण्याची काम केले पाहीजे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, व्हिजेएनटी सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव, प्रदेश सरचिटणीस प्रकाश राठोड, प्रदेश महासचिव बी. एम. पवार, प्रदेश प्रवक्ता प्रा. श्रीराम मुंडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष हरिष चव्हाण, सोलापूर जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण, नांदेड जिल्हाध्यक्ष अमोल वाकोडे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुनिल शेंडगे, पुणे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे, शेवंताबाई राठोड, सुनिताताई राठोड, पारूबाई चव्हाण, नलावडे ताई तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Read also
- हेही वाचा..सलग तीन दिवस सत्तासंघर्षावरील सुनावणी पुर्ण, न्यायालयाने घेतला हा निर्णय
- हेही वाचा..“साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा? शुद्धीवर ये” पुण्यात राष्ट्रवादी अन् मनसेत जुंपली
- हेही वाचा..“धंगेकरांच्या पोस्टवरून राष्ट्रवादी गायब, आघाडीत नेमकं काय चाललंय?
- हेही वाचा..“भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मत”, खासदार श्रीरंग बारणे
- हेही वाचा..“जयंतीसारखे शब्द लावताना काळीज जड होते, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; लक्ष्मण जगतापांच्या जयंतीनिमित्त पत्नी अश्विनी जगताप यांच्या भावना