मुंबई : ब्रिस्बेनच्या गाबामध्ये खेळण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारता क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. मालिकेच्या पहिल्या कसोटीत पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघ अवघ्या 36 धावांवर बाद झाला होता. मात्र भारतीय संघाने भूतकाळ विसरत पुढील सामन्यांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय क्रिकेट संघाच्या या विजयातून काँग्रेसने प्रेरणा घ्यावी, असा सल्ला माजी नेत्याने पक्षाला दिला आहे.
काँग्रेसचे माजी नेते आणि प्रवक्ते संजय झा यांनी ट्विट करत भूतकाळातील गोष्टींपासून रडणे आणि ओरडणे थांबवा व लढा असा सल्ला दिला आहे.
They were bowled out for 36 in the first Test.
The comeback is made of fairy-tale stuff.For my good ole Grand Old Party there is as inspirational message here. We got 44. :-)).
Get up, shake off the dust and dirt, and fight. And stop moping and crying about the past.
— Sanjay Jha (@JhaSanjay) January 19, 2021
भारतीय संघ पहिल्या कसोटीत 36 धावांवर ऑल आउट झाला. पण नंतर अविश्वसनीय पुनरागमन केलं. यामध्ये माझ्या जुन्या पक्षासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. आम्हाला 44 जागा मिळाल्या उठा…धूळ झटकून द्या… आणि लढा द्या आणि भूतकाळाबद्दल ओरडणे…रडणे आता थांबवा, असे ट्विट करत झा यांनी काँग्रेसला सल्ला दिला. त्यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे.
ज्या प्रमाणे पहिल्या सामन्यात पराभव होऊन देखील भारतीय क्रिकेट संघाने मालिकेत विजय मिळवला, त्यातून प्रेरणा घ्यावी, असे झा यांनी म्हटले आहे.
Read Also :
- आजपासूनच मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- पावसाळ्यापूर्वी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करा, मुख्यमंत्र्यांचे बीएमसीला निर्देश
- ‘मजबूत वाडा घुशींनी पोखरून काढावा, तशीच…’; चीनच्या मुद्यावरून सेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- … तर तुमचा वीज पुरवठा खंडित होणार, महावितरण देणार ‘शॉक’
- महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार, पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय