नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत आजपासूनच (20 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीस सुरुवात होणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
याआधी सर्वोच्च न्यायालयाने 9 डिसेंबरला मराठा आरक्षणाला स्थगिती देत, 25 जानेवारीपासून या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू होईल, असे म्हटले होते. मात्र आता 5 दिवस आधीच याप्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर ठाकरे सरकारवर मराठा समाज आणि भाजपने सडकून टीका केली होती. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि नोकर भरतीवर देखील त्याचा परिणाम झाला होता.
न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी पार पडणार आहे.
महाराष्ट्र सरकारने आशिष गायकवाड, राजेश टेकाळे, रमेश दुबे पाटील, अनिल गोळेगावकर व अभिजीत पाटील या वकिलांची सुनावणीसाठी समन्वय समिती केली आहे.
Read Also :
- पावसाळ्यापूर्वी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करा, मुख्यमंत्र्यांचे बीएमसीला निर्देश
- ‘मजबूत वाडा घुशींनी पोखरून काढावा, तशीच…’; चीनच्या मुद्यावरून सेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- … तर तुमचा वीज पुरवठा खंडित होणार, महावितरण देणार ‘शॉक’
- महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार, पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय
- ‘ओबीसी नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न’