मुंबई : पावसाळ्यात पाणी साचू नये याकरिता नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होते. काही ठराविक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर आता पावसाळ्याआधी नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
महानगरातील 386 ठिकाणी पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. त्यातील 171 ठिकाणांचे काम पूर्ण झाले असून 120 ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे एकूण 291 ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. मुंबई शहरात पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, मुंबईत सुमारे 344 उड्डाणपूल असून त्यापैकी सौंदर्यीकरणासाठी 42 पुलांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत स्ट्रीट फूड हब करण्यात येत असून त्यासाठी 62 रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील पादचारी मार्गांचे वॉडनिहाय सौंदर्यीकरण केले जात आहे. त्यासाठी 24 वॉर्डमधील 149 पादचारी मार्गांची निवड करण्यात आली आहे.
Read Also :
- ‘मजबूत वाडा घुशींनी पोखरून काढावा, तशीच…’; चीनच्या मुद्यावरून सेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- … तर तुमचा वीज पुरवठा खंडित होणार, महावितरण देणार ‘शॉक’
- महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार, पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय
- ‘ओबीसी नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न’
- ‘कोण आहे जेपी नड्डा ? मी त्यांना का उत्तर देऊ ?’, राहुल गांधींचा निशाणा