मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले आहेत, अशा प्रकारचे चित्र आहे, अशी खरमरीत प्रतिक्रीया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली असून पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली, असा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला आहे. यावरून शेलारांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
समीर वानखेडेच्या जातीचा दाखला खोटा ठरल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार – नवाब मलिक
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडी कडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही. मग चौकशीअंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली? जलयुक्त शिवारमुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती, असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
बिघडलेल्या बबड्यासारखी भाजपची अवस्था झाली, नेते खिशात आगपेटी घेवून फिरतायं – निलम गोऱ्हे
मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर, केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं, हे सिध्द होते. राजकीय द्वेषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.
Read Also :
- …तर एकनाथ खडसे यांना ईडी वाजत गाजत परत पाठवेल; गिरीश महाजनांचा टिमटा
- देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचे अधःपतन बघवत नाही – संजय राऊत
- समीर वानखेडे मुस्लीमच आहे, त्याचे वडीलही मुस्लीम; पहिलं लग्न लावून देणाऱ्या कांझी चाच्याचा खळबळजनक दावा
- भाजपला धक्यावर धक्के; उल्हासनगरमधील २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही; संभाजीराजेंचा सरकारला इशारा