मुंबई : राज्यात २८ हजार ग्रामपंचायती असून यामध्ये सुमारे चार हजार ग्रामपंचायतींना कार्यालये नाहीत. त्यामुळे आता नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधण्याचा निर्णय घेतला असून त्या कार्यालयांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांनी शिवतीर्थावर दर्शन घेतलं. त्यानंतर ते बोलत होते.
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल
एकनाथ शिंदे यावेळी बोलतांना म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. शासनाच्या प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हे बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पुर्णत्वासन नेत आहोत. तसेच अयोध्येत राममंदिर २०२४ साली पुर्ण होणार असून बाळासाहेबांच्या जन्मदिवासाच्या पुवसंध्येला हा योग जुळून येत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं असतं असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल
दरम्यान, मराठा आरक्षणावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, ओबीसी आरक्षण कुठेही कमी होणार नाही. मराठा समाजाला न्याय कसा मिळेल ही सरकारची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचं मुख्य कामांकडे दुर्लक्ष,” आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना पत्र, केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राडा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…“भुजबळांचं वय झालंय, पण आपला दर्जा घसरू देणार नाही,” जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार”, आरक्षणासाठी वडेट्टीवारांनी घेतला प्रण