पिंपरी चिंचवड: जनतेला फसवून हे तीन पक्षाचे सरकार उभे राहिले आहे. त्यामुळे तीनही पक्षातील नेते एकमेकाचे हितसंबंध जपण्यात मश्गुल आहे. त्यामुळे, ओबीसी आरक्षणासह इतरही समाजाचे आरक्षण टिकविण्यासाठी ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तीन पक्ष एकत्र येवून बनवलेले सरकार नवे असल्याने आम्ही सुरूवातीला निर्णय घेण्यासाठी वेळ दिला. परंतू, आता जनतेचा संताप व्यक्त करण्याची वेळ आली आहे. कारण या सरकारची ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची नियत राहिली नाही. त्यामुळे २६ जून रोजी महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलनाच इशारा आम्ही दिला आहे, असे भाजप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी या ठिकाणी राज्यव्यापी ओबीसी आऱक्षण बचाव बैठक घेण्यात आली. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
यावेळी भाजपचे ओबीसी आघाडी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, महिला उपप्रदेशाध्यक्षा उमा खापरे,पिंपरी चिंचवड नव नगर विकास प्राधिकरणाचे माजी अघ्यक्ष सदाशिव खाडे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या, हे सरकार केवळ जनतेची दिशाभूल करत आहे. जनतेला येडे बनवून तीन पक्ष एकत्र आले आहे. त्यामुळे एकमेकांचे हितसंबंध जपने, एकढाच उद्देश या सरकारचा आहे. जनतेसाठी काडीमात्र तळमळ करण्याची इच्छा या ठाकरे सरकारची नाही. त्यामुळे, ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही २६ जून रोजी चक्का जाम करण्याची हाक दिली आहे. यामध्ये इतर समाजातील छोट्या-मोठ्या संघटना देखिल सहभाग नोंदवतील, असे मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, २४ मार्च रोजी सुप्रिम कोर्टाचा निकाल आला. त्याचवेळी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करा, इंपिरियल डाटा तयार करून मागासवर्गिय अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. मात्र या सरकारने १०० टक्के याकडे दुर्लक्ष केले. आम्ही सत्तेत असताना वेळोवेळी कोर्टात आरक्षणाची बाजू मांडून आरक्षण टिकवले. मी स्वत: ग्रामविकास मंत्री असताना तेव्हा आम्ही कोर्टाकडे अहवाल सादर कऱण्यात वेळ मागितला होता. परंतू, आचारसंहिता सुरू झाल्या. नंतर हे निवडणूका होऊन ठाकरे सरकार तयार झाले आणि या सरकारने जनतेची १०० टक्के दिशाभूल केली, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हे पण वाचा, प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब: भाजपशी जुळवून घेऊन परत युती करण्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला
केवळ केंद्राकडे बोट दाखवत आहेत
फडणवीस सरकार असताना आम्ही आरक्षणासाठी लढा दिला. आताचे सरकार केवळ केंद्राकडे बोट दाखवत आहे. शिवाय, रस्त्यावर येवून आंदोलन करण्याची भाषा करीत आहे. आम्ही सत्तेत असताना कधी आंदोलनाची भाषा केली नाही. केवळ न्यायासाठी लढलो. ठाकरे सरकार न्याय देण्याऐवजी आंदोलन करत आहे, यापेक्षा मोठा जोक काय असू शकतो, असे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा, प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर; राजकीय भूकंप होणार? नितेश राणेंचं ट्विट
२६ जूनलाच आंदोलन का?
२६ जून हा छत्रपती शाहू महाराजांचा जन्म दिवस आहे. शाहू महाराजांचा आदर्श मोठा आहे. महाराष्ट्र्रातील सर्वसामान्या जनतेसाठी, त्यांच्या न्याय, हक्कासाठी मोठा लढा दिला आहे. बहुजन समाजासाठी त्यांचे मोठे बलिदान आहे. त्यांचा आदर्श महाराष्ट्रातील जनतेने घेण्यासारखा आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी २६ जून ही तारीख महत्वाची ठरते. त्यामुळे महाराष्ट्रात २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
हे पण वाचा, भाजपकडून शिवसेनेचे आमदार गायब झाल्याची तक्रार; ठाण्यात चर्चेला उधाण
भूजबळांनी न्याय द्यावा, आंदोलन नाही
राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना आंदोलनाची भाषा करने शोभत नाही. आंदोलन करण्याऐवजी भूजबळांना माजी विनंती आहे की त्यांनी ओबीसी समाजाचा इंपेरिकल डाटा तयार करावा. आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपूरवठा करावा. त्याचबरोबर त्यांनी मागसर्गिय अहवाल सादर करून त्यांना न्याय कसा देता येईल, या दृष्टीने पाऊले टाकावी, असेहा पंकजा मुंडे यांनी सांगितले.
हे पण वाचा,
अजितदादांनी चमकोगिरीसाठी पुणेकरांना संकटात ढकलले – महापौर मोहोळ
तुम्ही स्वबळ वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार, हे चालणार नाही!
फडणवीस सरकारच्या काळातील महापालिका प्रभाग रचनेला, महाविकास आघाडीने लावला सुरुंग