मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २० जानेवारीला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापणार असून दौऱ्याच्या आधी सरकार कोणती भूमिका घेणार ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. त्याआधी मुंबईचा दौरा कसा असणार आहे ? याबाबत त्यांनी एबीपी माझा दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
हेही वाचा…बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकचा धोबीपछाड; भारतीय कुस्ती संघ बरखास्त!
समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावे लागणार आहे. आम्ही २० जानेवारीला अंतरवाली सराटी गावातून पायी निघणार आहोत. जालना, नांदेड, बुलढाणा तसेच लातूर, पुर्वेकडील सर्व जिल्ह्यातील मराठा बांधव अंतरवाली सराटी गावात अगोदरच दाखल होतील अन् त्याठिकाणांहून आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार. यादरम्यान, आम्ही दोन ते तीन टीम या सर्व मार्गाची पाहणी करण्यासाठी गेल्या आहेत. मुंबईकडे ट्रॅक्टर, ट्रक आणि सोबतच जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार आहे. अंदाजे १० लाख वाहनं असण्याची शक्यता आहे. तर जवळपास ३ कोटी मराठे मुंबईच्या दिशेने कुच करणार. या दौऱ्याच्या वेळी आम्ही पारंपारीक खेळ खेळत जाणार आहोत. वारकरी सांप्रदाय तसेच इतर साहित्य सोबत घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं.
हेही वाचा…कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
दरम्यान, या दौऱ्याच्या वेळी तीन तुकड्या पाडल्या जाणार आहोत. पहिली तुकडी पिण्याच्या पाण्याची सोय करणार, दुसरी तुकडी डॉक्टरांची असणार आहे. तर तिसरी तुकडी जेवणाची सोय करणार. सोबतच आम्ही पीठ, मीठ तेल सोबत घेऊन जाणार आहोत. याचा सर्व खर्च गावकरी मिळून करणार, तसेच जेवणाची सोय सगळी गाड्यांमध्ये केली जाईल. प्रत्येक गावात खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तू गोळा केल्या जाणार. काहीजण गावात काहीजण मुंबईत खिंड लढवणार असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“अजितदादा खरं बोलले, खासदार शिरूरमध्ये येत नाही”, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टिका
हेही वाचा..राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना मोठा धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या गळाला?
हेही वाचा…अजितदादांनी संधी दिली तर कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढवणार, विलास लांडे यांचं मोठं विधान
हेही वाचाकोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
हेही वाचा…“केंद्राची कीड आता राज्यालाही लागली, भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय,” कुणी केली टिका?