पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी थेट शरद पवार गटाच्या नेत्यांवर टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. त्याआधी अमोल कोल्हे यांनी मागील पाच वर्षात लोकसभा मतदारसंघातील सहा ही विधानसभा मतदारसंघात काम केलं नसल्याची टीका केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या कामाचा पाढा वाचत शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार देणार आणि आमचा उमेदवार निवडून आणणारच असा थेट इशाराच अजित पवारांनी दिलाय. यावर आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
अजित पवार यांनी आज स्पष्टपणे सांगितले की काही खासदारांनी मतदार संघात कामे केली नाही आणि आता शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आहे. शिरूर मतदारसंघात पाच वर्षे लोकांनी आक्रोश केलाय की खासदार येत नाही. आता तेच खासदार सरकारच्या विरोधात आक्रोश करायला लागले तेही निवडणुका आल्या म्हणून. अजित पवार बोलले ते योग्य आणि वस्तुस्थिती आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असेल की महायुतीचा हे माहिती नाही. पण शिरूर लोकसभेत महायुतीचा उमेदवार महत्वाचा. असे शिवाजीराव आढळराव पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…“तर लोकसभेच्या ४८ जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, अजितदादांनी शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याचं घोषीत केल्यानंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपली इच्छा व्यक्त केली. अजितदादांनी जे सांगितलंय ते खरं आहे. असंही त्यांनी म्हटलंय. अजित दादांनी संधी दिली तर खासदारकी लढणार असल्याची प्रतिक्रिया विलास लांडे यांनी दिली आहे. तसेच मागच्या वेळेस आपली जोरदार तयारी झाली होती. त्यावेळी अमोल कोल्हे यांना पक्षांनी संधी दिली. त्यानंतर मी अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करून थांबलो. परंतु आता आपली उमेदवारी शंभर टक्के आहे. असंही लांडे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना मोठा धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या गळाला?
हेही वाचा…अजितदादांनी संधी दिली तर कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढवणार, विलास लांडे यांचं मोठं विधान
हेही वाचाकोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
हेही वाचा…“केंद्राची कीड आता राज्यालाही लागली, भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय,” कुणी केली टिका?
हेही वाचा..बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकचा धोबीपछाड; भारतीय कुस्ती संघ बरखास्त!