पुणे : आगामी निवडणुकीत लोकसभेच्या ४८ जागांच्या तयारीला लागा असे आदेश वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यावरून आता पुढील निवडणुका वंचित स्वबळावर लढणार असे संकेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचितला आपल्यासोबत घेण्यात यावं, अशी बोलणी मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना दिलीय.
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या स्मरणशक्तीत काहीतरी गडबड, छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही”, भुजबळांचा पलटवार
इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली, तेव्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांच्याशी वंचित बहुजन आघाडीबाबत चर्चा केली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घ्यायला हवं, असं खर्गे यांना सांगितलं आहे. परंतु लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा प्रत्येकाला आहे. यावर आता अजून पुढे पाहू? अशी प्रतिक्रिया देखील शरद पवार यांनी वंचितच्या युतीबाबत दिली आहे.
हेही वाचा…मराठा आंदोलन मुंबईत धडकणार, जरांगे पाटलांची घोषणा ! एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुतम मिळालं पाहिजे. यासाठी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही राज्ये महत्वाची आहेत. अन्य राज्यांत आपल्याला काम करता येणार नाही. पण महाराष्ट्रात काम करता येईल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणकीत हे एकत्र आले नाही तर आम्हाला ४८ जागा स्वबळावर लढवाव्य लागतील. असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल केले. साने गुरूजी यांच्या जंयतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत कार्यकर्त्यांना त्यांनी काही सुचना देखील केल्या. यावरून आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कुणाला किती जागा मिळणार? धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची आमदारकी रद्द झाली नाही, परंतु केदारांची तातडीने रद्द झाली”, वडेट्टीवारांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचाअमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणारच, अजितदादांचं खुलं चॅलेंज, अमोल कोल्हेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा..ठरलं तर मग..! आघाडीत असं असणार लोकसभेच्या निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला
हेही वाचा…अमोल कोल्हेंची कुंडली अजितदादांनी वाचली..! शिरूरचा उमेदवार निवडूनच आणणार, अजितदादांचा इशारा