मुंबई : मराठा आरक्षणाबाबात राज्यात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर येत्या २० जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी बीड येथील इशारा सभेतून केली आहे. दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटीशन स्विकारलं असून येत्या २४ तारखेला यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मिंधे सरकारचं गुन्हेगारांना वरदान,” ठाकरे गटाची शिंदेंवर जोरदार टिका
सर्वोच्च न्यायालयाने आताच एक मोठा निर्णय दिला असून २४ जानेवारीला कोर्ट क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार आहे. ही याचिका फेटाळली जाईल, असं सांगितलं जात होतं. परंतु कोर्टाने मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आहे. २४ जानेवारीला तज्ञांची मोठी फौज बाजू मांडेल, मराठा समाज मागास कसा आहे हे सांगेल. परिस्थिती सांगेल. कोर्टाने ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर करण्याचं काम वकिलांची फौज करेल. मला वाटतं मराठा समाजाला न्याय मिळेल, अस मत एकनाथ शिंदे यांनी मांडलं आहे.
हेही वाचा..पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या दिवशी शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी का? छगन भुजबळांचा सवाल
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते मांडले नव्हते. पण यावेळी निष्णात वकिलांची फौज बाजू मांडेल. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था, शांतता राहिली पाहिजे. सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा. मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पिटीशन ऐकली जाणं ही जमेची बाब असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईत कशी धडक मारायची ? जरांगे पाटलांनी सांगितला अॅक्शन प्लॅन
हेही वाचा.“जरांगे पाटलांची मोठी घोषणा, २० जानेवारीला मराठा वादळ मुंबईत धडकणार “, शिवाजी पार्कवर आमरणचा दिला इशारा
हेही वाचा…ठाकरेंनी आदेश दिला तर लोकसभा लढवणार, अंबादास दानवेंनी खैरेंचं वाढवलं टेन्शन
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालयातून मराठा समाजासाठी गुड न्यूज, कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन याचिका स्विकारली
हेही वाचा…“शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती पण.. त्यावेळी..” प्रफुल्ल पटेलांनी सांगितला तो किस्सा