बीड : मराठ्यांनी मुंबईकडे कुच केली तर आरक्षण घेऊनच माघारी फिरणार असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर शिवाजी पार्कवर २० जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार, असं मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केलं आहे. मुंबईत जाताना कुठेही हिंसा नको. सर्वांनी शांततेच मुंबईला जायचं. असंही मनोज जरांगे पटालांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…शरद पवारांची साथ द्यायला नातू मैदानात, पवार कुटुंबीयातील आणखी एक व्यक्ती राजकारणात
जाणूनबूजून कोणताही मराठा सरकारला त्रास देणार नाही. आता बीडच्या सभेत जवळपास १२ ते १३ लाख मराठे सभेसाठी आले आहेत कोणाला त्रास झाला का ? पोलीस सुद्धा आता आरामात उभे राहिले आहेत. तसेच जो हिंसा करेल तो आपला नाही. लक्षात ठेवा. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही. आता त्यांना टेन्शन आलं असेल देव जरी आडवा आला तरी आरक्षण घेणारच असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो,” अजित दादांच्या या वक्तव्याचा काॅंग्रेसने घेतला समाचार
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ यांंचं ऐकून आरक्षण नाकारू नका. अन्यथा सरकारला जड जाईल. एकदा आरक्षण मिळालं की नंतर काय ते दाखवतो. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंनी आदेश दिला तर लोकसभा लढवणार, अंबादास दानवेंनी खैरेंचं वाढवलं टेन्शन
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालयातून मराठा समाजासाठी गुड न्यूज, कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन याचिका स्विकारली
हेही वाचा…“शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती पण.. त्यावेळी..” प्रफुल्ल पटेलांनी सांगितला तो किस्सा
हेही वाचा…“मिंधे सरकारचं गुन्हेगारांना वरदान,” ठाकरे गटाची शिंदेंवर जोरदार टिका
हेही वाचा..पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या दिवशी शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी का? छगन भुजबळांचा सवाल