मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापत चालला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटलांना दिलेली तारिख उद्या संपत आहे. त्याआधी बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा पार पडली. या सभेत त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या २० जानेवारीपासून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. यात मुंबईत येण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लोकांना अॅक्शन प्लॅन देखील सांगितला आहे.
हेही वाचा..पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या दिवशी शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी का? छगन भुजबळांचा सवाल
बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षीतील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार आहे. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. जाती पेक्षा मोठा नेता मानू नका. आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा. असं आव्हान करत सरकारने दहा बारा दिवस मिळत आहेत ते बघावते. एकदा अंतरवालीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा…शरद पवारांची साथ द्यायला नातू मैदानात, पवार कुटुंबीयातील आणखी एक व्यक्ती राजकारणात
दरम्यान, पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडे कुच करतील. मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही. मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही. कुणीही जाळपोळ, तोडफोड करायची नाही. शांततेच जायचं. शांततेच यायचं. जो हिंसा करेल तो आपला नाही. हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायचं नाही. असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा.“जरांगे पाटलांची मोठी घोषणा, २० जानेवारीला मराठा वादळ मुंबईत धडकणार “, शिवाजी पार्कवर आमरणचा दिला इशारा
हेही वाचा…ठाकरेंनी आदेश दिला तर लोकसभा लढवणार, अंबादास दानवेंनी खैरेंचं वाढवलं टेन्शन
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालयातून मराठा समाजासाठी गुड न्यूज, कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन याचिका स्विकारली
हेही वाचा…“शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती पण.. त्यावेळी..” प्रफुल्ल पटेलांनी सांगितला तो किस्सा
हेही वाचा…“मिंधे सरकारचं गुन्हेगारांना वरदान,” ठाकरे गटाची शिंदेंवर जोरदार टिका