पुणे : निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे कुणाला संघर्ष यात्रा तर कुणाला पदयात्रा सुचते.असा टोला लगावत शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आणि अमोल कोल्हे यांना पाडणारच असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना निवडणुकीत खुलं चॅलेंज दिलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना निवडणुकीत उभं राहणार असल्याचं विधान केलंय.
हेही वाचा…“जरांगे पाटलांची मोठी घोषणा, २० जानेवारीला मराठा वादळ मुंबईत धडकणार “, शिवाजी पार्कवर आमरणचा दिला इशारा
अजित पवार म्हणाले की, पुण्यात संघर्ष यात्रा होत आहे. परंतु त्याच्यातील एका खासदारांने मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर फार बरं झालं असतं. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि मी जीवाचं रान केलं आहे. त्याला मी खासदारकी दिली आहे. काही दिवसापुर्वी अमोल कोल्हे राजीनामा देण्यासाठी माझ्याकडे आला होता. मधल्या काळात स्थानिक मतदारसंघात फिरले नाहीत. दुर्लक्ष केले. त्यांनी पुर्णपणे मला आणि वरिष्ठ नेत्यांना राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं. एक कलावंत आहे. माझ्या करिअरवर परिणाम होत आहे. चित्रपट चालत नाहीत. याचा माझ्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होतो. अशाही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या.
हेही वाचा…ठाकरेंनी आदेश दिला तर लोकसभा लढवणार, अंबादास दानवेंनी खैरेंचं वाढवलं टेन्शन
शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षापासून माझ्या मतदारसंघात अत्यंत प्रमाणिक भावना ठेऊन काम करतो आहे. निवडणुक ही फार महत्वाची किंवा एखाद्याला आव्हान देऊन करण्याची गोष्ट नाही. ही प्रतिनिधी, काम करण्याची गोष्ट आहे. अजितदादा फार मोठे नेते आहे. त्यांच्या आव्हानाला आणि प्रतिसादला प्रत्युत्तर देणं मी मोठा नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर १००टक्के निवडणुक लढणार. कारण मतदारसंघात काम करतो आहे. असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
अजितदादांनी ज्यावेळेस संघर्ष यात्रेवरून टोला लगावला. त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला असलेले अनेक जण लोक हसले. त्यात एका महिलेचा देखील समावेश होता. त्यावरून देखील अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यावेळेस मला हसण्याचा आवाज आला. त्या हसणाऱ्या व्यक्तीला हात जोडून विनंती करेन की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची, दुध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती एकदा जाऊन बघा. शेतकऱ्यांच्या पोरांना कर्ज मिळत नाहीत. त्या जाऊन बघायला हवं. फक्त हसण्यावारी नेणं गोष्टी हे दुर्दैव आहे. ज्यांना हसू येतंय. त्यांनी बघावं की मागच्या वेळी कांद्यावर निर्यात शुल्क लागलं होतं. त्यावेळी कुणी कंबरडं मोडलं. त्यांनी सांगावं. दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून देखील कोल्हेंनी संताप व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा..ठरलं तर मग..! आघाडीत असं असणार लोकसभेच्या निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला
हेही वाचा…अमोल कोल्हेंची कुंडली अजितदादांनी वाचली..! शिरूरचा उमेदवार निवडूनच आणणार, अजितदादांचा इशारा
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या स्मरणशक्तीत काहीतरी गडबड, छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही”, भुजबळांचा पलटवार
हेही वाचा…मराठा आंदोलन मुंबईत धडकणार, जरांगे पाटलांची घोषणा ! एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…मुंबईत कशी धडक मारायची ? जरांगे पाटलांनी सांगितला अॅक्शन प्लॅन