मुंबई : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक रोखे घोटाळ्यात दोषी आढळ्याने काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा ठोठवली आहे. सध्या त्यांच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांनी राजपत्रित अधिसूचना काढून सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता राज्यातील विरोधकांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा..अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणारच, अजितदादांचं खुलं चॅलेंज, अमोल कोल्हेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही खटल्यात दोन वर्षापेक्षा जास्त काळ तुरूंगवासाची शित्रा झाल्यास आमदारकी रद्द होते. मात्र यापुर्वी नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदार सुधीर पारवे यांना देखील शिक्षा झाली होती. पण तो कालवधी कमी होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे भाजपने केदार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. त्यावरून विरोधकांनी भाजप अन् केंद्र सरकारवर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा..ठरलं तर मग..! आघाडीत असं असणार लोकसभेच्या निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला
केंद्राची कीड आता राज्यालाही लागली असल्याची जहरी टिका करत आव्हाडांनी केंद्र सरकारला फटकारलंय. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचं सरळ मार्गाने काही वाकडं करता येत नाही म्हणून मिळेल त्या संधीचा वापर करून आमदार, खासदारांवर त्यांनी कारवाईचा सपाटा लावलाय .महाविकास आघाडीतील काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाविरूद्ध अपील करण्याची संधी न देता त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची सरकारला इतकी घाई का लागली आहे. ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
हेही वाचा…अमोल कोल्हेंची कुंडली अजितदादांनी वाचली..! शिरूरचा उमेदवार निवडूनच आणणार, अजितदादांचा इशारा
दरम्यान, सुनील केदार यांनी नागपूरात भाजपची चांगलीच कोंडी करून ठेवली होती, त्याचा वचपा काढण्याचा हा डाव आहे. निकालाविरूद्ध न्यायालयात अपील करण्याची संधी हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा संवैधानिक अधिकार आहें. पण आधी आरएसएस आणि आता भाजपने संविधान न मानण्याची आणि बदलण्याची शपथ घेतली असल्याने ते मनाला वाट्टेल तसं वर्तन करत आहेत. पण संविधानाची निर्मिती आमच्या बापाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे, हे विसरू नका. सत्ताधारी आमदार, खासदारांना एक न्याय आणि विरोधी पक्षाला दुसरा हा भाजपचा दुटप्पीपणा आता लपून राहिलेला नाही. असा हल्लाबोल देखील आव्हाडांनी केला आहे.
केंद्राची किड आता राज्यालाही लागली आहे. भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचं सरळ मार्गाने काही वाकडं करता येत नाही म्हणून मिळेल त्या संधीचा वापर करून आमदार, खासदारांवर त्यांनी कारवाईचा सपाटा लावलाय.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते… pic.twitter.com/YJUW7qAEHI
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा..बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकचा धोबीपछाड; भारतीय कुस्ती संघ बरखास्त!
हेही वाचा.कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
हेही वाचा…“तर लोकसभेच्या ४८ जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कुणाला किती जागा मिळणार? धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची आमदारकी रद्द झाली नाही, परंतु केदारांची तातडीने रद्द झाली”, वडेट्टीवारांची मोठी प्रतिक्रिया