पुणे : खासदार अमोल कोल्हेंच्या तक्रारीचा पाडा आज अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांसमोर मांडला. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार देणार आणि अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार, असा इशारा अजित पवारांनी दिला. त्यावर लोकशाही आहे, शरद पवारांनी आदेश दिला तर पुन्हा निवडणुकीसाठी उभा राहणार अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिलीय. तर अजित पवारांनी संधी दिली तर लोकसभा लढवणार अशी इच्छा विलास लांडे यांनी व्यक्त केलीय. त्यामुळे आता पुन्हा शिरूरमधील राजकारण तापण्यास सुरूवात केलीय.
हेही वाचा…अमोल कोल्हेंची कुंडली अजितदादांनी वाचली..! शिरूरचा उमेदवार निवडूनच आणणार, अजितदादांचा इशारा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खासदार अमोल कोल्हेची संघर्ष यात्रा किल्ले शिवनेरीवरून पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यावर अजितदादांनी जोरदार टिका केली. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून कुणी संघर्ष यात्रा, कुणी पदयात्रा काढत आहेत. एका खासदाराला संधी दिली होती. पंरतु त्यांनी विधानसभांच्या सहाही मतदारसंघाकडे दुलर्क्ष केले. दीड वर्ष झाल्यानंतर राजीनामा देण्यासाठी आले होते. त्यांनी मतदारसंघात काहीच काम केले नसल्याचं सांगत शिरूर लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार देणार आणि निवडून आणणार असं अजित पवार यांनी म्हटलंय.
अजित पवार म्हणाले की, पुण्यात संघर्ष यात्रा होत आहे. परंतु त्याच्यातील एका खासदारांने मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर फार बरं झालं असतं. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि मी जीवाचं रान केलं आहे. त्याला मी खासदारकी दिली आहे. काही दिवसापुर्वी अमोल कोल्हे राजीनामा देण्यासाठी माझ्याकडे आला होता. मधल्या काळात स्थानिक मतदारसंघात फिरले नाहीत. दुर्लक्ष केले. त्यांनी पुर्णपणे मला आणि वरिष्ठ नेत्यांना राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं. एक कलावंत आहे. माझ्या करिअरवर परिणाम होत आहे. चित्रपट चालत नाहीत. याचा माझ्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होतो. अशाही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या.
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या स्मरणशक्तीत काहीतरी गडबड, छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही”, भुजबळांचा पलटवार
दरम्यान, अजित दादांनी शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याचं घोषीत केल्यानंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपली इच्छा व्यक्त केली. अजित दादांनी संधी दिली तर खासदारकी लढणार असल्याची प्रतिक्रिया विलास लांडे यांनी दिली आहे. तसेच मागच्या वेळेस आपली जोरदार तयारी झाली होती. त्यावेळी अमोल कोल्हे यांना पक्षांनी संधी दिली. त्यानंतर मी अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करून थांबलो. परंतु आता आपली उमेदवारी शंभर टक्के आहे. असंही लांडे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“तर लोकसभेच्या ४८ जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कुणाला किती जागा मिळणार? धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची आमदारकी रद्द झाली नाही, परंतु केदारांची तातडीने रद्द झाली”, वडेट्टीवारांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचाअमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणारच, अजितदादांचं खुलं चॅलेंज, अमोल कोल्हेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा..ठरलं तर मग..! आघाडीत असं असणार लोकसभेच्या निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला