मुंबई – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी काल विधान सभेत मनसेचे खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. खेड नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावरून त्यांनी राज्य सरकार आणि वैभव खेडेकर यांना चांगलेच धारेवर धरले. खेडमधील भडगाव आहे. तिथे बौद्धवाडी असल्याचं दाखवून समाजकल्याणचा 20 लाखांचा निधी आणून नाल्यावर पूल बांधला. बौद्धवाडीच्या नावाने खासगी बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी हा पूल बांधला. असा आरोप त्यांनी केला आहे. यावर आता मनसे खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाच्या प्रियांका बारसे ‘भरभरुन हसल्या’ अन् राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणेंच्या ‘अडचणी वाढल्या’!
रामदास कदम हे पुत्रप्रेमापोटी वैफल्यग्रस्त अवस्थेत अनेक चुका करत आहेत. त्यातीलच ही चूक आहे. त्यांनी ती चूक परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलीच. पण माझ्याबाबतही ते सातत्याने करत आहेत”, असा घणाघात वैभव खेडेकर यांनी केला. रामदास कदम यांची विधान परिषदेची मुदत आता संपत आलेली आहे. जाताजाता काहितरी करावं, या विचारातून त्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिली आहे. यातून सतत्यता उघड होईल. त्यांनी पुलाचं प्रकरण सांगितलं. त्याठिकाणी माझा कोणताही बंगला किंवा बिल्डिंग नाही. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याबाबत मी कोर्टात जाईलच, असं वैभव खेडेकर यावेळी म्हणाले.
“बारा आमदार निलंबित असताना अध्यक्षपदाची निवडणूक कशी घेता?”; मुनगंटीवारांनी उठवला सवाल
ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही अशा पुलाशी माझा वारंवार संबंध जोडला जातोय. तिथे माझं एक रुपयाचं बांधकाम नाही. तिथे माझा कुठलाही फ्लॅट नाही. तरीही ते लोकं सातत्याने माझ्यावर आरोप करत आहेत. हेच अध्यक्ष असलेल्या शिवसेना आरोग्य सेवा संस्थेने खेड नगरपालिकेचा भूखंड शंभर टक्के सत्ता असताना घेतलेला आहे. त्यांनी ठराव करुन एक रुपया नाममात्र भाड्याने तो भूखंड घेतलेला आहे. त्यावर मोठी बिल्डिंग बांधली आहे. या बिल्डिंगच्या परवानगीत तफावत आहे. अपूर्ण कागदपत्रांच्या आधारावर बिल्डिंगला परवानगी दिली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवले असून अहवाल दिलेले आहेत. विधान परिषदेत खरंतर हे प्रकरण गाजायला हवं होतं. या विषयावर मी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अशा पद्धतीच्या काही गोष्टी समोर आणून सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. पण सभागृहातील सर्व सदस्य प्रगल्भ आणि विचार करणारे आहेत. या प्रकरणात लवकरच सत्य बाहेर येईल”, असं खेडेकर म्हणाले.
Read also:
- “त्याचे धागेदोरे कुठपर्यंतही जाऊ द्या, त्यांच्यावर कारवाई होणारच”; पेपरफुटीप्रकरणावरून अजित पवारांचा इशारा
- सायबर पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
- फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांचे समन्स
- “महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा
- ही प्रजाती फक्त भंगारात आढळते; डुकराचा फोटो शेअर करत नितेश राणेंनी केली ‘या’ मंत्र्यावर टीका