मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेत सगळीकडे चलबिचल सुरू झाली आहे. अशातच दरवर्षी शिवाजी पार्क येथे होणारा दसरा मेळावा हा एकनाथ शिंदे घेणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवाजी पार्क याठिकाणी होणारा दसरा मेळावा हा आपणच घेणार, तसेच यावेळी हजारो शिवसैनिकांनी यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
“तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा
शिवसेनेला 56 वर्ष झाली असून ती रस्त्यावर पडलेली वास्तू नाही की ती कोणीही उचलावी आणि खिशात टाकावी. शिवसेना ही निष्ठावंतांच्या रक्तावर मोठी होणारी संघटना आहे असून ती गद्दारांच्या निष्ठेवर नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. त्यामुळे कोणीही कितीही मनात संभ्रम निर्माण केला तरी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असं उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला ठणकावून सांगितलं आहे.
“रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर
संघ परिवारातील अनेक लोक आज शिवसेनेत आले आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील देखील मातब्बर लोक आज शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. साधारण सत्ताधारी पक्षाकडे पक्ष प्रवेशासाठी रांग लागते मात्र आज सत्तेत नसलेल्या पक्षाकडे प्रवेशासाठी रिख लागली आहे. महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते गद्दारांना जन्म देत नाही. याची प्रचिती दाखवणारी मंडळी आज शिवसेनेत येत आहेत. असंही ते म्हणाले. आज कळमनुरीचे काॅंग्रेसचे माजी आमदार संतोष टार्फे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
“कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष
दरम्यान बंडखोर आमदारांना गद्दारी कशासाठी केली हेच सध्या समजत नाही. काय काय बोललो होतो आणि आज काय बोलत आहोत. याचे त्यांना भान राहिले नाहीत. त्यामुळे राजकारणात या गोष्टी होत राहणार. अनेक विषयांवर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. हिंदुत्वाच्या एका भ्रामक कल्पनेमध्ये आपण फसलो असा ज्यांना ज्यांना वाटत आहे. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला”
- “जन्मदात्या आईची, बायकोची अन् बहिणीची आठवण असू द्या”; राष्ट्रवादीकडून गुलाबराव पाटलांना समज
- “गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होतं, पण त्यांना ते मिळालं नाही”
- “विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही”; नितीन गडकरी
- चंद्रकांत खैरे अन् शिरसाट यांच्यात मान सन्मानावरून वाद; इम्तियाज जलील यांची मध्यस्ती