नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला बंधनकारक मग कर्नाटकाला का नाही? सीमावादावर सर्व पक्ष कर्नाटकात एकत्रित उभे राहतात ते चित्र आपल्याकडे दिसत नाही. आजचे मंत्री कर्नाटकचे जन्म घ्यावा असं म्हणतात मग न्यायाची अपेक्षा कुणाकडे करणार ? त्यामुले सीमावादावर केंद्र सरकार खरचं पालकासारखं वागतंय का ? बेळगाव, निपाणी, कारवार हा सीमाभाग न्याप्रविष्ठ असेपर्यंत केंद्रशासित करा, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत म्हटलं.
“अजित दादा..! तुम्ही वेळ चुकली, तो शपथविधी दुपारी झाला असता तर…”; अन् भाजपच्या आमदारांनी
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधान परिषदेच्या सभागृहात दाखल झाले. त्यांनी सुरूवातीलाच महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद छेटला. यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र आणि दिल्लीत एकाच पक्षाचे सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधानांना आपला नेता मानतात. दिल्लीत मुख्यमंत्री गेले, गृहमंत्र्यांसमोर चर्चा केली. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आहे परिस्थिती जैसे थे ठेवायचं ठरलं. मग परिस्थिती कुणी चिघळवली. बेळगावचं नामांतरण केले गेल. मराठीत पाटी लावली. मराठीत बोलले म्हणून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आले. असंही ठाकरे म्हणाले.
पवार साहेबांचा तुम्हाला फोन आला होता का? अन् अजित पवार भडकले, नाराजीवरील चर्चा फेटाळली
सीमाभागातील लोकांना महाराष्ट्रात यायचं आहे. सीमावादाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत असल्याची चांगली गोष्ट आहे. याच प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारने या विषयाबाबत एक चित्रपट बनावलं होतं. केस फॉर जस्टीस असं या चित्रपटाचा विषय होता. बेळगाव, कारवार, निपाणी येथील लोकं 1857 पासून त्याठिकाणी मराठी पाट्या वापरत आहेत. तेथील लोकांनी कशा पद्धतीने मराठीचा वापर केला आहे. आणि हा ठराव आपण का आणत आहेत असंही यामध्ये दाखवण्यात आलं आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- “राष्ट्रवादीत घुसमट होत असून अजित दादा आमच्यासोबत आल्यास आनंद”
- राजकारण तापणार..! ठाकरे पहिल्यांदाच सभागृहात अन् विरोधकांवर ‘पेन ड्राईव्ह वार’
- आजचा दिवसही वादळी ठरणार…! सत्ताधारी अन् विरोधक विधानभवनाऱ्यांच्या पायऱ्यांवरच आमनेसामने
- “विधान भवन परिसरात शाईच्या पेनाला बंदी मात्र ‘सिगारेट’ ओढायला खुली परवानगी”?
- “तुम्ही समजता तसे मोदी नाही, ते हिंदुत्ववादीही नाहीत;” मोदींना भाजपचाच घरचा आहेर