मुंबई : सोलगाव-बारसू येथील रिफायनरीविरूद्ध गेल्या काही दिवसापासून स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. या आंदोलना दरम्यान अनेकांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. यातच आज शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्थानिकांशी संवाद साधला. त्याआधी उद्धव ठाकरे यांना बारसूत येऊ देणार नाही. त्यानंतर ही उद्धव ठाकरे बासूत दाखल झाले, अन् त्यांनी मुख्यमंत्र्यांसह नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
हेही वाचा…रश्मी ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले की, “आमची भेट..”
उद्धव ठाकरे यांनी राजापुरमध्ये जात असतांना नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना टाटा एअरबस, बल्कड्रग्ज पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणले होते. मात्र हे सर्व प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आणि आता वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला असं मी होऊ देणार नाही. आपल्याच जनतेला नुकसान पोहोचवून हे सरकार विकास करणार असेल तर असा विकास आम्हाला नको. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“ते पुन्हा आले खरं, पण…”,म्हणून नाना पटोलेंनी फडणवीसांना डिवचलं
यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली. लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू असा इशाराही ठाकरेंनी राज्य सरकारला दिला.
READ ALSO :
हेही वाचा…“‘टिल्ल्या-पिल्ल्या’ असं उल्लेख करत राणेंवर सेनेची जहरी टिका, उद्धव ठाकरे बारसुत दाखल”
हेही वाचा…जयंत पाटलांसाठी शरद पवार पाच मिनिटे थांबले, राष्ट्रवादीमधील बंड रोखण्यासाठी त्यांच्याकडे “नवी” जबाबदारी?
हेही वाचा…“गावोगावी, चौकाचौकात साखर वाटून साजरा आनंद करा, प्रदेशाअध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना आवाहन
हेही वाचा…“कुणाला जायचं असेल तर त्यांना मी..” , अजित पवारांच्या प्रश्नांवर शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“अखेर शरद पवाराच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम, पवारांची मोठी घोषणा”