मुंबई : मराठा आरक्षणा पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी देखील आरक्षण रद्द ठरवले आहे. त्यामुळे, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. दरम्यान, यावर आता ओबीसी समाज आणि नेत्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हे पण वाचा, ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही; पकजा मुंडे म्हणतात…
दरम्यान, आज याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपच्या ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी, ३ तास चाललेल्या या बैठकींनंतर पत्रकार परिषद घेत, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी, ओबीसी समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून देण्याच्या मागणीसाठी, भाजपकडून राज्यात २६ जूनला चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
हे पण वाचा, ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार
यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी देखील, ट्विट करत या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली असून, “केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. pic.twitter.com/HqOlOU6XuH
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2021
ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. pic.twitter.com/0qzMCgrUHB
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2021
या बैठकीला पंकजाताई मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजय कुटे, मनिषाताई चौधरी, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, चित्राताई वाघ आणि इतरही सहकारी उपस्थित होते. pic.twitter.com/InXXslkgn9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2021
तसेच, “ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ,” अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या बैठकीला पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रक्षा खडसे, अतुल सावे, डॉ. संजय कुटे, मनिषा चौधरी, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ हे उपस्थित होते.
Read Also :
- ‘तुम्ही कोणतेही गुंड असा, आम्ही जिजाऊंच्या लेकी तुमच्याशी चार हात करायला सज्ज’
- दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस, फुटकळ कामांची जाहिरातबाजी करतोय
- मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास, त्याला शिवसेना जबाबदार असेल!
- ‘अशी दंडुकेशाही चालणार नाही’;भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा
- ‘तो दिवस लांब नाही ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील’