मुंबई : रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत मोठी घोषणा करताना, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, असा निर्णय जाहीर केला. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी, “हा निर्णय घेण्याआधी आमच्याशी राज्य सरकारने चर्चा केली असती, तर बरं झालं असतं”, असं वक्तव्य केलं आणि त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांत खडाजंगी सुरु झाली.
आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी – रावसाहेब दानवे
शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरून रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक दानवेंवर हल्लाबोल केला आहे. “मोदीसाहेबांच्या मंत्रीमंडळातील राज्यमंत्र्यांना असे अधिकार तर किती आहेत. त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकारच नाहीत आणि जे फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत, त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही”, असा खरमरीत टोला त्यांनी लगावला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना एकाच वाटेवर?
रविवारी मुख्यमंत्र्यांनी लोकल प्रवासाबाबत घोषणा केल्यानंतर, “रेल्वेची भूमिका स्पष्ट आहे. प्रवाश्यांना तपासून आत सोडण्यात येईल. आम्ही लोकल सुरू करायला तयार आहोत. पण क्युआर कोड कुणी तपासायचा? आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी, असं केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी असमर्थता दर्शवली. यानंतर यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
मुंबईची लोकल रेल्वे भाजपाची नोकर आहे का? संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना प्रश्न
दुसरीकडे, आज मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी, लोकल प्रवासाच्या अटीबाबत आज अधिक सांगताना, “रविवारी मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत स्पष्ट आदेश दिले. त्यात ज्यांनी लसीचे २ डोस घेतले आहेत, त्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल असे सांगितले. मात्र अजून एक अट अशी आहे, की दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस झाले असतील, तरच हा त्यांना हा पास मिळेल. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे गरजेचे आहे”, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
Read Also :
- नाशकाताही राष्ट्रवादी-शिवसेनेत ठिणगी; उड्डाणपुल उदघाटनाच्या कार्यक्रमावरुन भुजबळ, शिवसेना खासदारावर नाराज
- अजित पवारांचे दोन स्वीय सहाय्यक, खास पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी भवनात बसणार
- संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
- “पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो”- महादेव जानकर
- शिवसेना खासदार संजय जाधवांच्या १० मिनिटांच्या भाषणाने अधोरेखित केली राष्ट्रवादी-शिवसेनेतील दरी?