मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेचं ढग गडद होत असतानाच आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ होत आहे. मुलांच्या लसीकरणासाठी देशभरात तयारी करण्यात आली असून, महाराष्ट्रातही तब्बल 650 लसीकरण केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्येही व्यवस्था करण्यात आली असून, मुंबईतही 9 केंद्रांवर मुलाचं लसीकरण केलं जाणार आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात नवा वाद, बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव गायब
कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा देशात वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला होता. 1 जानेवारीपासून लस नोंदणी सुरू झालेली असून, लसीकरण आजपासून सुरू होत आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील 650 केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण केलं जाणार आहे.
पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (1 जानेवारी) सुरू करण्यात झालेली आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मी अजित पवारांचा मोठा फॅन; भाजप आमदार जयकुमार गोरेंनी उधळली दादांची स्तुतीसुमने
2007 मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले कोरोना लस घेण्यासाठी पात्र असल्याचंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ केला जाणार आहे. जालन्यातील जिल्हा महिला रुग्णालयात लसीकरण कार्यक्रम होणार आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे 2007 या वर्षी किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलं लस घेण्यासाठी पात्र आहेत. लस घेण्यासाठी शाळेचं किंवा आधार ओळखपत्र असणं आवश्यक आहे. कोविन या अॅपवरून वा थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येणार आहे.
Read also:
- “आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!”
- मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांचा झेंडा; सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय
- याची ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नाही आणि म्हणे भावी खासदार; आमदार गोरंट्यालांची खोतकरांवर टीका
- शिवसैनिक म्हणून आम्हाला जगू द्या, दुसरी कोणतीही मागणी नाही; राष्ट्रवादीच्या कुरघोड्यांमुळे आढळराव हतबल?
- १३ महापालिकांत होणार ओबीसी आरक्षणाविना निवडणुका; निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना मोठा धक्का