मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरावा, अन्यथा हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या आव्हांना प्रतिसाद देत राज्यात काही ठिकाणी मंदिरांवर हनुमान चालिसा लावण्यात आली. तर पुण्यात या संदर्भात पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी बंडाची भूमिका आपल्याला प्रभागात शांतता ठेवावी असं सांगितलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मनसेतून वसंत मोरे यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे.
वसंत मोरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना ऊत; रुपाली ठोंबरेंनी पाठराखण केल्याने संभ्रम
वसंत मोरे यांच्या जागी आता साईनाथ बाबर यांची मनसे पुणे शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राज ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत पुण्यात मुस्लिम कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांच्या हाकालपट्टीमुळे आता मनसेला गळती लागली आहे. तसेच सकाळी वसंत मोरे हे मनसेच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून देखील लेप्ट झाले होते. त्यामुळे वसंत मोरे आता काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सोमय्या पिता पुत्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल”; आयएनएस विक्रांत प्रकरण भोवणार
वसंत मोरेंचा प्रभाग मुस्लिम बहुल असल्याने त्यांना अडचण निर्माण झाल्याबद्दल प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी तसे बोलून दाखवले. त्यानंतर आता वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. वसंत मोरेंना आगामी काळात मनसेच्या हिंदुत्वाच्या मुद्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाऊ शकतात असं बोललं जात आहे.
राऊतांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती; इडीच्या कारवाईवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान, वसंत मोरे यांनी याबाबत समोर येऊन या सगळ्या अफवा जाणून बुजून पेरल्या जात असल्याचे म्हटले आहे आणि पक्ष प्रवेशाबाबत जी काही चर्चा सुरु आहे त्याचे खंडन केले आहे. वसंत मोरे यांनी जरी आता या सर्व गोष्टींचे खंडन केले असले तरी मुस्लिम बहुल भाग वार्डात जास्त असल्याने त्यांना मनसेच्या विरुद्ध भूमिका घ्यावीच लागेल अशी चर्चाही रंगली आहे.
Read also:
- शेतकऱ्यांना घेऊन किरीट सोमय्या इडीच्या दरबारी! नवी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत
- तुमच्याच पक्षाचे नेते मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे का? इम्तियाज जलीलांचा सवाल
- तुम्ही तर काय $$$? काय कापलं सांगा? राऊतांची फडणवीसांवर टीका करताना जीभ घसरली
- देशद्रोही किरीट सोमय्यांची वकिली फडणवीसांनी करू नये; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
- “दिलगिरी व्यक्त करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या दाव्याला सामोरे जा”; बंटी पाटलांचा शेलारांना संतप्त इशारा