मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यामध्ये पवार आणि ठाकरे कुटुंबीय वगळता आघाडीतील महत्वाच्या नेत्याची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यावरून आता राज्यात एकच चर्चा रंगली आहे. तसेच यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टिका केली जात आहे. यातच काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
“राष्ट्रवादीने २३ वर्षात साडेसतरा वर्ष सत्तेत राहून जनसेवा केली”
केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते. मात्र मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. सुरक्षा काढल्यामुळे नक्षलग्रस्त भागात मी करत असलेले काम किंवा दौरे कमी होणार नाही. मात्र लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यापुर्वी राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता. असं विजय वडेड्डीवार यांनी म्हटंल आहे.
“मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद द्यावा”; सेेनेची जहरी टिका
शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीतील नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जंयत पाटील, नितीन राऊत, बंडी उर्फ सतेज पाटील विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नरहरी झिरवाळ, सुनील केदारे आणि डेलकर पाटील यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. तर अपक्ष आमदार रवी राणा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
“सध्याच्या घडीला नारायण राणेंची किंमत चार आण्याची आहे”
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता नवीन राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.
Read also
- “कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही”
- “केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करून राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवताहेत”
- “केंद्रातील लाड पुरवता पुरवता भाजप महाराष्ट्राला भिकेला लावणार”
- “खेकड्यांची चाल लोकं स्विकारत नाही, हिमंत असेल तर याचा पुरावा द्या”; रोहित पवार
- अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे