अमरावती : नाना पटोले सध्या महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि रुग्णालयांना भेट देण्यासाठी पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी काँग्रेसचं देशातलं काय भवितव्य असेल, यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
यावेळी त्यांनी, ‘यूपीएचा आत्मा हा काँग्रेस आहे. त्यामुळे देशात पंतप्रधान देखील काँग्रेसचाच होईल,’ असे विधान केले आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने, अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात देखील वातावरण चिंतातूर आहे. या पार्श्वभूमीवर, नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
तसेच, ‘प्रशांत किशोर यांनीसुद्धा दोन वेळा सांगितलं आहे, राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान बनणार, त्यामुळे आमचा लोकशाहीवर विश्वास आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी, जे लोकं देशात अजून एक नवीन यूपीए किंवा तिसरी आघाडी स्थापन होईल आणि त्याचा चेहरा शरद पवार असतील, अशी चर्चा करत आहेत, त्या लोकांनीच आता काँग्रेस हा युपीएचा आत्मा आहे, असं सांगितलं आहे. त्यामुळे पंतप्रधान देखील काँग्रेसचाच होईल’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
यावेळी, ‘देशात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली २ वेळा यशस्वीपणे काँग्रेसने सरकार चालवलं आहे. त्यामुळे आमच्याबद्दल सर्व जनतेला माहित आहे, आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही’, असं मत त्यांनी प्रदर्शित केलं आहे.
Read Also :
- आणखी एक मंत्री मंत्रिमंडळातून जाणार? अनिल परबांच्या अडचणीत वाढ
- चंद्रकांतदादाना काय झालंय माहित नाही; मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंची भूमिका योग्य
- ‘केंद्रात ‘राम’भरोसे, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार जाणार हे नक्की’
- मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली – राहुल शेवाळे
- यंदाच्या आषाढी वारीचा वाद, तुषार भोसले भिडले थेट अजितदादांना म्हणाले…