पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून आपल्या ४० आमदारांसह थेट गुवाहाटी गाठलं. एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांसह १० अपक्ष आमदार देखील शिंदेसोबत गुवाहाटील गेलेत. यामध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू देखील सहभागी झाले होते. यातच आता गुवाहाटीला का गेलो होतो? याबाबत बच्चू कडू यांनी भाष्य केलंय.
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर
बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांग मंत्रालय होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण त्यांनी नाही केलं. ते सरकार बदललं. मलाही गुवाहाटीला जाण्याचं बोलावणं आलं. देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला. मग गुवाहाटीच्या वाटेला लागलो. पण त्याअगोदर देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की अगोदर दिव्यांग मंत्रालय करा तर मी तुमच्यासोबत येणार. गुवाहाटीला गेल्याने आम्ही बदनाम झालो. ५० खोके ५० खोके असा आमचा उल्लेख केला. पण मला बदनामीची काची चिंता नाही.
हेही वाचा…“कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं, म्हणून एवढे घाबरता का ?”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय उभे केले. मी दिव्यांगांसाठी उभा राहिलो. सर्वजण मंत्रीपद मागत होते. आम्हाला मंत्रालय भेटले आहे. मंत्रीपदाचं काय देणंघेणं? असंही बच्चू कडू यांनीही म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“सिलेंडर ५०० रूपये., महिलांना महिन्याला १५०० रूपये, १०० युनीट वीज युनीट माफ,” काॅंग्रेसने ‘या’ राज्यात केल्या मोठ्या घोषणा
हेही वाचा…अजित पवारांमुळे शिंदेंच्याआमदारांची गोची अन् रामदास आठवले सांगताहेत, “आम्हालाही मंत्रिपद हवंय”
हेही वाचा…कांदा सगळ्यांनाच रडवणार, केंद्र सरकारचा फसवा डाव
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,