नवी दिल्ली : आगामी काही महिन्यात देशात विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी देशातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू करून दिली आहे. यात मध्यप्रदेशसाठी काॅंग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहे. काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलीय.
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार विचारतात की काॅंग्रेसने ७० वर्षात काय केलं आहे. त्यावर आम्ही साक्षरता दर जो १८ टक्के होता तो आता ७४ टक्के पर्यंत गेला आहे. त्यामध्ये महिला साक्षरता दरात ७ टक्के पासून ६५ टक्के पर्यंत नेण्यात आला आहे. त्यात बालक मृत्यू दर कमी झाला आहे. मोदी सरकार फक्त काम करण्यामध्ये नाही तर खोटं बोलण्यात माहिर आहेत. अशी घणाघाती टिका मल्लिकार्जून खरगे यांनी मोदींवर केलीय.
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,
दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये काॅंग्रेसचं सरकार आलं तर गॅस सिलेंडर हे ५०० रूपये, प्रत्येक महिलांना प्रति महिना १५०० रूपये, वीज १०० युनीट माफ, तर २०० युनिट हाफ, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, जुनी पेन्शन योजना, तसेच जातीय जनगणना करणार अशा महत्वाच्या घोषणा मल्लिकार्जून खरगे यांनी केल्या आहेत. मध्यप्रदेशसह राजस्थान मध्ये आगामी महिन्यात निवडणुका होत आहेत. त्यासाठी काॅंग्रेसने आता घोषणा केल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“आमच्याकडून संग्राम थोपटेंवर अन्याय झाल्यासारखं वाटतं”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याची कबुली
हेही वाचा…“राज्यात फक्त ९४ तालुक्यात १०० टक्के पाऊस, तर ३१९ वाड्यांमध्ये ३६९ टॅंकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा”
हेही वाचा…शिंदेंसोबत गुवाहाटीला जातो पण…, बच्चू कडूंनी सांगितला फडणवीसांसोबतचा किस्सा
हेही वाचा…अजित पवारांमुळे शिंदेंच्याआमदारांची गोची अन् रामदास आठवले सांगताहेत, “आम्हालाही मंत्रिपद हवंय”