पुणे : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी काॅंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत आलं. याची पावसाळी अधिवेशनात चर्चा देखील झाली. परंतु त्या जागी विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली. अन् संग्राम थोपटे यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दिसून आली. यावर त्यांनी देखील दुजोरा दिला. यावर आता काॅंग्रेसचे विधानसभा गटनेता बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलंय.
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,
संग्राम थोपटे विधानसभेतील लढाऊ सदस्य आहेत. काॅंग्रेसबरोबर राहुन संघर्ष करण्याची थोपटे यांची परंपरा राहिलीय. संग्राम थोपटे यांना मंत्रिपद मिळावे ही आमची अपेक्षा होती. विधानसभेचा अध्यक्ष करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील होतो. आता विरोधी पक्षनेतेपदाची विषय आहे. आमच्याकडून संग्राम थोपटे यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतं. पम सगळ्याची परतफेड झाल्याशिवाय राहणार नाही. असं बाळासाहेब थोरतांनी म्हटलंय.
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर
दरम्यान, २०१९ साली सरकार आल्यानंतर मंत्रिपदाची संधी मिळेल, अस वाटत होतं, पण संधी मिळाली नाही. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदही मिळालं नाही. विरोधी पक्षनेतेपदाबाबत पक्षश्रेष्ठी विचार करतील अस वाटतं होतं. मात्र पुणे जिल्हा म्हटलं की का डावललं जातं हे मला कळलं नाही. पक्षश्रेष्ठी डावलतात, असं नाही. परंतु यामागे पुणे जिल्ह्यातील राजकीय शक्ती कोणाची आहे. हे सांगण्याची गरज नाही. असं संग्राम थोपटे यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात फक्त ९४ तालुक्यात १०० टक्के पाऊस, तर ३१९ वाड्यांमध्ये ३६९ टॅंकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा”
हेही वाचा…शिंदेंसोबत गुवाहाटीला जातो पण…, बच्चू कडूंनी सांगितला फडणवीसांसोबतचा किस्सा
हेही वाचा…अजित पवारांमुळे शिंदेंच्याआमदारांची गोची अन् रामदास आठवले सांगताहेत, “आम्हालाही मंत्रिपद हवंय”
हेही वाचा…कांदा सगळ्यांनाच रडवणार, केंद्र सरकारचा फसवा डाव
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार