मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पर्जन्यमान आणि पाणी नियोजनाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील महत्वाचे मंत्रीही हजर होते. या बैठकीत राज्यात पर्जन्यमान आणि पाणी नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती सांगितली.
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर
एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात कोकण व नागपूर विभागात हलका पाऊस झाला आहे मात्र नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती या विभागात पाऊस झालेला नाही. राज्यात सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या १५ असून ५० ते ७५ टक्के पर्जन्यमान झालेल्या तालुक्यांची संख्या १०८ तर ७५ ते १०० टक्के पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांची संख्या १३८ असून ९४ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
हेही वाचा…“कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं, म्हणून एवढे घाबरता का ?”
खरीप २०२३ मध्ये आतापर्यंत १३८.४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा या पाच जिल्ह्यात अधिकतम पेरणी झाली असून सोयाबीन व कापूस पिकाची अधिकतम पेरणी या हंगामात झाले आहे. राज्यात सध्या ३५० गावे, १३१९ वाड्यांमध्ये ३६९ टॅंकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
हेही वाचा…“२४१० नाही तर ४००० प्रतिक्विंटल कांद्याला भाव द्या,” शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे आगामी काळात चांगला पाऊस व्हावा अशी अपेक्षा आहे मात्र सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला तर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना सुरूवात करावी. त्यामध्ये धरणातील पाणी साठा पाहून जिल्हाधिकारी यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून काटकसरीने पाणी वापराचे नियोजन करावे. ग्रामीण भागात देखील विहिरी, तलावातील उपलब्धता पाहून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंसोबत गुवाहाटीला जातो पण…, बच्चू कडूंनी सांगितला फडणवीसांसोबतचा किस्सा
हेही वाचा…अजित पवारांमुळे शिंदेंच्याआमदारांची गोची अन् रामदास आठवले सांगताहेत, “आम्हालाही मंत्रिपद हवंय”
हेही वाचा…कांदा सगळ्यांनाच रडवणार, केंद्र सरकारचा फसवा डाव
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,