मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात आज सकाळपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणापासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. दरम्यान, कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. पण, भर पावसात हा मराठा मोर्चा निघत आहे.
हे पण वाचा: मराठा मोर्चाला सुरुवात; संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल
हे पण वाचा: मराठा आरक्षणासाठी दिल्ली दरबारी मोर्चा काढावा? संजय राऊत म्हणतात….
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल. तसेच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आणि आधीच्या सरकारने दिलेल्या सर्व सवलती पुन्हा मिळेपर्यंत होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.
हे पण वाचा: आंदोलनाआधी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं; अजित पवाराकंडून खुलासा
हे पण वाचा: “विनाशकाले विपरीत बुद्धी” अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था – उपमुख्यमंत्री अजित पवार
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. हे आंदोलन मूक असेल. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसेच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे.
हे पण वाचा: अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा: नाना भाऊ कसे मुख्यमंत्री होणार? अजित पवारांचे सुचक विधान