कर्जत: कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू तसेच माजी मंत्री प्राध्यापक. राम शिंदे यांच्यात शनिवारी अर्धा तास बैठक झाल्याची चर्चा रंगली होती. राम शिंदे यांचा अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी पराभव केला होता. तरीदेखील अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात बैठक झाल्याच्या वृत्तामुळे चांगल्याच राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या.
हे पण वाचा, राष्ट्रवादीला नगरच्या ‘कुकडी’ खालील शेतीचे वाटोळे करायचे आहे, राम शिंदेंचा आरोप
हे पण वाचा, राम शिंदे यांनी कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत हुरळून जाऊ नये; घनशाम शेलार यांचा सणसणीत टोला
राज्यात सध्या नेत्यांच्या गुप्त बैठकांचे जणू सत्रच चालू आहे असे म्हणायला हरकत नाही. दिल्लीत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बैठक झाली. त्यातच राम शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील भेटीमुळे चर्चांना उधाण आल्यासारखे झाले होते. त्यातच याभेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळली गेली आणि खूप काही महत्वाच्या गोष्टींबाबत बोलणे झाले असे देखील म्हटले जात होता.
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
हे पण वाचा, अखेर कुकडीचे आवर्तन सुटले; आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवारच्या विशेष प्रयत्नांना यश
राम शिंदे हे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांचाच काही विशेष निरोप घेऊन राम शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले असे देखील म्हटले जात होते. ही भेट राज्यातील घडामोडींची नांदी तर नाही ना अशी देखील चर्चा सुरु झाली होती. मात्र आपल्यात आणि अजित पवारांमध्ये कोणतीही भेट झाली नसल्याचे पत्रकारांना राम शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल्याने आता चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
हे पण वाचा,
कुकडीच्याही पाण्यात मशाल पेटली, न्यायालयीन लढ्यासाठी कुकडी संघर्ष समिती स्थापन
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
नागपूर: राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही