नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या आधी दहा वर्ष आला, पण त्याला मी पक्ष म्हणणार नाही. ती निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे. शरद पवार आजवर हेच करत आले, जे निवडून आले त्यांना एकत्र करून म्हणतात हा माझा पक्ष. आता वेगळे झाले तरी ते निवडून येणारच आहेत. खऱ्या अर्थाने पक्ष कोणते असतील तर ते म्हणज जनसंघ, शिवसेना आणि मनसे. अशी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा…“मित्रपक्षांनी भाजपशी लढावं, काँग्रेसचा नाद करू नये”, माजी महिला मंत्र्यांनी आंबेडकरांना फटकारलं
पुढे बोलतांना ते म्हणाले की, अटलीजींचं पहिलं १३ दिवसाचं, दुसरं १३ महिन्याचं, मग साडेचार वर्ष… मनसेने १८ वर्षात अनेक चढउतार पाहिले, चढ कमीच पाहिले उतारच जास्त पाहिले. पण तुम्हाला यश मिळवून देणार, हा माझा शब्द आहे, त्यासाठी संयम हवा, ठहराव हवा.. मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको, माझ्यात आहे ताकद तेवढी.
हेही वाचा…मराठा आरक्षणाचं खापरं राज ठाकरेंनी भाजपवर फोडलं, म्हणाले..”हा प्रश्न रखडवत ठेवला जातो, कारण..”
दरम्यान, मनसेचा वर्धापनदिन दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख शहरात साजरा करण्याचा आमचा मानस आहे. राजकारणात टिकण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट लागते ती म्हणजे पेशन्स. तुमच्या आजूबाजूच्या पक्षांचं यश पाहिलंत तर लक्षात येईल, की संयम महत्त्वाचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मिळवलेलं यश हे आजचं नाही, तर त्याचं संपूर्ण श्रेय इतकी वर्ष पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं आहे. १९५२ साली पक्ष स्थापन झाला जनसंघ, १९८० मध्ये त्याचं भारतीय जनता पक्ष असं नामकरण झालं. अडवाणी, अटलजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अशा अनेकांनी झटल्याने पक्षाला आज यश मिळालं.”
READ ALSO :
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या”, पंकजा मुंडेंच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“900 एकरवर सभा, कोट्यवधी मराठे एकत्र येणार,” जरांगे पाटलांचा निवडणुकीपुर्वी सरकारला कडक इशारा
हेही वाचा…“तेव्हा रोखठोक अन् आता जागा मिळवण्यासाठी भाजपची लाचारी”, शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…“आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो..” युवकांसाठी कॉंग्रेसची ‘पाच’ ऐतिहासिक गॅरेंटी
हेही वाचा..“रोहित पवारांचा सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून छळ”, राऊतांची भाजपवर आगपाखड