नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचं जलभुजन होत आहे. निळवंडे धरणातील डाव्या कालव्याचं लोकार्पण होत असून अनेक गावांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथील मंदिरात जाऊन साईबाबाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत.
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड, मराठा क्रांती मोर्चाने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी धरण बांधण्यात यावं अशी मागणी १९७० दरम्यान पुढे आली होती. त्यानंतर निळवंडे धरणाला १९७७ साली मंजूर देण्यात आली होती. मात्र १९७७ ते १९९१ पर्यंत धरणाची जागा निश्चित झालेली नव्हती. ज्याठिकाणी जागा निश्चित होत होती, तिथे प्रंचड विरोध होत होता.
हेही वाचा…श्रेयवादाची लढाई सुरू..! “मोदीजी आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे”, राष्ट्रवादीने मोदींना लगावला खोचक टोला
अकोला तालुक्यातील निळवंडे परिसरात १९९१ साली धरण बांधण्यात सुरूवात झाली आणि २०१२ साली या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. मात्र या धरणातून कालवे होणार होते, त्यासाठी २०२३ उजडावा लागला. मधल्या काळात विविध गोष्टींची कमतरता असल्याने या कालव्याचं बांधकाम रखडलं गेलं. निळवंडे कालवा समिती असो किंवा इतर समित्या तसेच शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलन केलीत. मात्र आज डाव्या कालव्याचा स्वप्न पुर्ण होतांना दिसत असून उजव्या कालव्याचा सुद्धा बांधकाम अंतिम टप्यात आहे. त्याचं देखील काम पुर्ण होईल.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींनी मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,” ठाकरेंची मागणी
हेही वाचा…मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले, गावात सुरू केलं ठिय्या आंदोलन
हेही वाचा…नरेंद्र मोदी साईनगरीत दाखल, तब्बल ७५०० कोटी रूपयांच्या विकास कामांचं होणार लोकार्पण
हेही वाचा…“हिंमत असेल तर मनोज जरांगे पाटलांना अटक करून दाखवा,” मराठा समाज आक्रमक, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड करणारा मंगेश साबळे कोण? अशी अनेक आंदोलने करण्यासाठी आहे प्रसिद्ध