पुणे : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पुण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. त्यानंतर हा अपघात झाला. याच पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
हेही वाचा…पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज तरूणांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान..! 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द
समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. २५ लोकांचा बळी जाणं ही बाब वेदना देणारी आहे. कदाचित शास्रीय दृष्ट्या नियोजन केलेलं नसावं. त्याचा दृष्परिणाम असा आहे. लोक मृत्यू होत आहेत. आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की, एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला. हा महामार्ग करण्याच्या काळात. नियोजन आखण्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांना लोक दोषी ठरवतात. असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
हेही वाचा…“..तो खरा नेता मराठा समाजाचा आरक्षणाचा कैवारी”, पंकजा मुंडेंचं पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर भाष्य
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केल्यानंतर भाजपने देखील त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. ८४ वर्षाचे शरद पवार झालेत. वाटतं होतं आतातरी राजकीय परिपक्कता येईल. पण नाही आजही त्यांचं चालू आहे. अपघातावर खालच्या थराचे राजकारण करून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घ्येयाची ही पवारांची खासियत. त्यांची अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांप्रति काळजी न संवेदना. असं भाजपने म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मला पप्पू बोलतात ना…पप्पू चॅलेंज देतो..या माझ्या अंगावर…छातीवर वार करा”, आदित्य ठाकरेंचं चॅलेंज
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेचा सातबारा फक्त शिवसेनेच्या बापाच्या नावावर”, धडक मोर्चातून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
हेही वाचा…भाजपच्या कॅनॉलमधून “राहुल कनाल” ला आता शुद्ध करणार का ? सुषमा अंधारेंचा भाजप अन् शिंदेंना सवाल
हेही वाचा…“बाळासाहेब आता हयात असते तर आदित्य ठाकरेंना लाथ मारून बाहेर काढलं असतं”
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर “या” गोष्टी करा अपघात टाळा..! अपघात टाळण्यासाठी दानवेंनी सुचवल्या ‘सात’ गोष्टी