मुंबई : वर्षा बंगल्यावर २ कोटी ४० लाख रूपयांचा खर्च झाल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. शिंदे सरकार आल्यापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडीही घडल्या. यालाच प्रत्युत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात अजित पवारांना उत्तर देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
हेही वाचा..“होय मी हिंदू, पण मी १०००००००००००% मनुवादीसनातन धर्माच्या विरोधात,” जितेंद्र आव्हाड
मागील सरकारच्या काळात कोवीड काळात अडीच वर्ष सर्वसामान्य लोकांसाठी वर्षा बंगला बंद होता. तिथे जाण्यासाठी कोविड टेस्ट करावी लागत होती. मग कुणीच जात नव्हतं. अजित पवारांना पुर्ण परवानगी होती. परंतु तिकडे कोणी माणसंच नव्हती ही सगळी माहिती त्यांना माहिती होती.असं असतांना त्यांचं महिन्याला किती बिल झालं. ? त्याची माहिती अजित पवारांनी माहिती घेतली नाही. माणसं नसतांना, फेसबुक लाईव्ह असतांना, कसा चहापाणी झाला? असा सवाल शिंदेंनी अजित पवारांना केला.
हेही वाचा..“मला उमेदवारी दिली असती तर रवींद्र धंगेकरांसारखा विजयी झालो असतो”, राहुल कलाटेंची खदखद
राज्यभरातून माझ्याकडे सोन्यासारखी माणसं येतात. तसेच अजित पवारांनी स्वत:चा जनसंपर्क वाढवण्यासाठी ६ कोटींचा खर्च केला. तसेच राज्य सरकारच्या ज्यो योजना आहेत. त्या सर्व जाहीराती आम्ही सकाळ, सामाना सगट सगळ्याच वर्तमानपत्रात देतो, असं म्हणत त्यांनी ठाकरेंनाही टोला लगावला.
Read also
- हेही वाचा..पोलीस भरतीचा तो मुद्दा अजित पवारांनी सभागृहात मांडला, राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी
- हेही वाचा..“छी..छी.. त्यावर कोण बोलणार?” नितेश राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
- हेही वाचा..“मी ही बापटांविरोधात निवडणुक लढवली होती, पण त्यांनी कधी असं केलं नाही”,रवींद्र धंगेकरांचं विधान
- हेही वाचा..“कसब्याचा पराभव भाजपच्या जिव्हारी, पुणे भाजपात भुकंप होण्याच्या हालचाली सुरू”?
- हेही वाचा..सतेज पाटलांकडे काॅंग्रेसने दिली मोठी जबाबदारी, विधानभवनात सत्ताधाऱ्यांना वेठीस आणणार ?