मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अंधेरी कोर्टात आणण्यात आलं. त्यावेळी मी ससून मधून पळून गेलो नाही तर मला पळवून लावलं आहे. सगळं उघड सांगणार असं म्हणत ललित पाटील यांनी या प्रकरणात आणखी बड्या व्यक्तींचा हात असल्याचं संकेत दिले. त्यानंतर राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी दोन मंत्र्यांवर आरोप केलेत. तर ललित पाटीलच्या चौकशीतून मोठं रॅकेट बाहेर येईल अन् यामधून अनेकांची तोंड बंद होणार असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळे आता ललित पाटील बोलला तर कोण अडकणार? याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…फडणवीसांच्या ‘महायुतीचा घटक पक्ष’ शरद पवारांच्या गळाला ? दिल्लीत मोठी खलबत्तं
ड्रग्स फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन जी परिषद झाली होती. त्या परिषदेत सगळ्या युनिट्सला ड्रग्सवर कंट्रोल ठेवलं पाहिजे आणि यातील नेक्सस शोधलं पाहिजे. अशा सूचना दिल्या होत्या. त्या माध्यमातून सगळे युनिट् कामाला लागले आहेत. याच माध्यमातून मुंबई पोलिसांना देखील नाशिक येथील कारखान्याची माहिती लागली आहे. त्यावर त्यांनी धाड टाकली आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी देखील धाडी टाकल्या आहे. आता ललित पाटील हातामध्ये आला आहे. निश्चितपणे यातून मोठे नेक्सेस बाहेर येईल. ललित पाटीलच्या चौकशीमधून एक मोठ नेक्सस आता बाहेर येणार असून यातून अनेकांची तोंड बंद होणार आहे. तसेच ससून रूग्णालया असो किंवा अन्य काही सर्व प्रकाराची चौकशी सुरू आहे. यातून कोणालाही सोडलं जाणार नाही. असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
हेही वाचा…ड्रग्जप्रकरणाबाबत नाशकात ठाकरे गटाचा मोर्चा, दादा भूसेंचा राजीनामा मागणार
देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाबाबत इशारा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतापल्या आहेत. त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसचं म्हणाताहेत की अनेकांची तोंड बंद होणार मग राज्याचे तुम्हीच गृहमंत्री असतांना ललित पाटील ससून रूग्णालयातून पळून गेला आहे. मग याची जबाबदारी गृह विभागाने घ्यायला नको. गृहविभागाच्या पोलिसांनीच ललित पाटीलला अटक केली आहे. त्यामुळे अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यायला हवं. असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बावनकुळेंचं वक्तव्य, अन् दुसरीकडे काका-पुतण्यात झाली लढाई, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…बारामती अॅंग्रो कंपनीचा लढा रोहित पवारांनी जिंकला, प्रदूण नियंत्रण मंडळाचे आदेश कोर्टाकडून रद्द
हेही वाचा…“आघाडीत वादावादी होईल, घासाघिस होईल, पण उमेदवार देऊ,” पृथ्वीराज चव्हाणांचं लोकसभेबाबत मोठं विधान
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार कार्यकर्त्यांना अखेर न्याय मिळाला, तडीपारचा आदेश कोर्टाने केला रद्द
हेही वाचा…चिठ्ठी लिहून मराठा बांधवाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिली ‘मराठा आरक्षणा’ची तारिख