मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २२ ऑक्टोंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्याआधी मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिट्टी लिहिली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर लढाई अर्ध्यावर टाकून जाऊन नका असं मराठा मोर्चेचे समन्वयक विनोदी पाटील यांनी आवाहन केलं आहे.
हेही वाचा…ललित पाटीलने तोंड उघडलं तर कोण अडकणार ? राज्यातील ‘या’ नेत्यांची नावे हिटलिस्टवर
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय असलेले सुनील बाबुराव कावळे याने मुंबईतील द्रुतगती मार्गावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील कावळे हे जालना जिल्ह्यातील अंबडचे रहिवासी आहेत. यातच माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवयय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. असं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या..! रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला १३७ कोटीची नोटीस, नेमकं प्रकरण काय आहे ?
दरम्यान, आपल्या चिठ्ठी त्यांनी असं म्हटलंय की, महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी माता, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, मी सुनील बाबुराव कावळे, मु. पो. चिकणगाव, तालुका अंबड, जि. जालना एकच मिशन, मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा, साहेब आता कुण्या नेत्याच्या सभेला जायचं नाही. ऑक्टोबर २४ हा मराठा आरक्षण दिवस. या मुंबईमध्येच आता माघार नाही. कुणी काहीही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्याचं नाव तोंडातून काढू नका. उठ मराठा जागा हो. पण लक्षात ठेवा, शांततेत यायचंय. शेतकऱ्यांच्या मुलांच्या भवितव्यचा हा प्रश्न आहे.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांच्या ‘महायुतीचा घटक पक्ष’ शरद पवारांच्या गळाला ? दिल्लीत मोठी खलबत्तं
हेही वाचा…ड्रग्जप्रकरणाबाबत नाशकात ठाकरे गटाचा मोर्चा, दादा भूसेंचा राजीनामा मागणार
हेही वाचा…आणखी एका मराठा बांधवाने आपले जीवन संपवले, मुंबईत ग’ळ’फा’स घेऊन केली आ’त्म’ह’त्या
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! नाशकातून ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, राहण्यासाठी घेतले होते 25 लाख
हेही वाचा…अजित पवारांना मराठा समाजाने घातली बंदी तर शरद पवारांची होणार ग्रॅंड एंन्ट्री