ठाणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांना तडीपारीच्या आदेशामागे कुठलेही तथ्य नसल्यासं म्हणत कोर्टाने तडीपारीचे आदेश रद्द ठरविले आहे. या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारत कडक शब्दात सुनावलं आहे. अभिजीत पवार यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांना ठाणे पोलिसांनी सहा जिल्ह्यातून तडीपार केले होते.
हेही वाचा…अजित पवारांना मराठा समाजाने घातली बंदी तर शरद पवारांची होणार ग्रॅंड एंन्ट्री
ठाण्याचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना ठाणे पालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अभिजित पवार यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती. या प्रकरणी आज उच्च न्यायालयात पहिलीच सुनावणी पार पडली.
हेही वाचा…ललित पाटीलने तोंड उघडलं तर कोण अडकणार ? राज्यातील ‘या’ नेत्यांची नावे हिटलिस्टवर
उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर तडीपारीची सुनावणी पार पडली. आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सारंग कोवाल यांनी पोलिस उप-आयुक्त गावडे आणि कोकण आयुक्तांनी दिलेले तडीपारीचे आदेश हे दोन्हीही रद्दबातल ठरविले आणि रद्दबादल ठरविताना या आदेशामागे कुठलेही तथ्य नसल्याचं म्हणत अभिजित पवार यांना मुक्त केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच न्यायव्यवस्थेने दिलेला हा निकाल पोलिसांनी वाचून पाहवा व स्वत: चे आत्मपरिक्षण करांव की आपण राजकीय गुलाम व्हायचं की न्यायाच्या बाजूने काम करायचं असंहीी आव्हडांनी सांगितलंय.
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या..! रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला १३७ कोटीची नोटीस, नेमकं प्रकरण काय आहे ?
दरम्यान, सहायक आयुक्ताला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर अभिजीत पवार यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चौघांनाही पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून नौपाडा पोलिसांनी चारही आरोपींच्या तडीपारीची कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना दिली होती. वरिष्ठांनी या चारही आरोपींना ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केल्याची कारवाई केली होती.
राजकीय सुडबुद्धीपोटी आणि द्वेषातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे प्रामाणिक कार्यकर्ते अभिजीत पवार यांना तडीपार करण्यात आलं होतं. या प्रकरणी आज मा. उच्च न्यायालयामध्ये पहिलीच सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. आज झालेल्या सुनावणीमध्ये…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…चिठ्ठी लिहून मराठा बांधवाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिली ‘मराठा आरक्षणा’ची तारिख
हेही वाचा…फडणवीसांच्या ‘महायुतीचा घटक पक्ष’ शरद पवारांच्या गळाला ? दिल्लीत मोठी खलबत्तं
हेही वाचा…ड्रग्जप्रकरणाबाबत नाशकात ठाकरे गटाचा मोर्चा, दादा भूसेंचा राजीनामा मागणार
हेही वाचा…आणखी एका मराठा बांधवाने आपले जीवन संपवले, मुंबईत ग’ळ’फा’स घेऊन केली आ’त्म’ह’त्या
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! नाशकातून ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, राहण्यासाठी घेतले होते 25 लाख