मुंबई : राज्यात झालेल्या पक्ष फुटीचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये होणार असल्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे. सुरुवातीला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे याचा मोठा परिणाम निवडणुकांमध्ये आपल्याला दिसून येणार असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. राज्यात आगामी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता इंडिया टुडे ने केलेल्या सर्व्हेमध्ये मोठी माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक राजकीय नेत्यांचे वर्चस्व कमी होऊन पक्षाला देखील मोठा फटका बसणार असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ चार शिलेदारांकडे पुण्याची जबाबदारी, संपूर्ण शहर पिंजून काढणार
लोकसभेच्या मागच्या निवडणुकीचा विचार केल्यास भाजपने 48 जागांपैकी 23 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता यामध्ये शिवसेनेच्या वाटेला 18 तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र पुढील लोकसभा निवडणुकीत मोठे बदल होणार असल्याचा इंडिया टुडे च्या सर्वात म्हटलय इंडिया टुडे ने केलेल्या सभेमध्ये राज्यात भाजपला एका जागेचा फटका बसणार असून २२ जागा मिळणार आहेत. तर देशातील प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेसच्या वाटेला 9 जागा मिळणार आहेत. यातच पक्ष फुटीनंतर शिवसेना शिंदे गटाला ४, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ८ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला दोन तर शरद पवार गटाला तीन जागा मिळणार असून अपक्षांना कोणतीही जागा मिळणार नसल्याची शक्यता सर्व्हे मधून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेसला एकही मत मिळणार नसणाऱ्या बुथ अध्यक्षाला ५१,०० रूपयांचे बक्षीस देऊ”, ‘या’ भाजप नेत्याची घोषणा
मतांच्या विभागणीत भाजपला सर्वात जास्त ३२ टक्के मतदान होणार असून त्या खालोखाल कॉंग्रेस आणि ठाकरे गटाला प्रत्येकी १५ टक्के मिळण्याचा अंदाज बांधला आहे. शिवसेना शिंदे गटाला १० टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ५ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १२ टक्के तर इतरांना ११ टक्के मतदान होणार असल्याचे सर्व्हेत सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या ९ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, त्याआधी मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”
दरम्यान, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ४५ जागा जिंकण्याचा भाजपने महासंकल्प ठेवला आहे. तर दुसरीकडे देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन करून मोदींच्या विरोधात एकजूटीने लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजप-शिंदे- अजित पवारांविरोधात ठाकरे मावळमध्ये लढणार, भाजपचा ‘हा’ जुना गडी ठाकरे मैदानात उतरवणार
हेही वाचा…राज ठाकरेंनी लोकसभेसाठी निवडले ‘९’ तगडे उमेदवार, भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेसवरही भारी पडणार ?
हेही वाचा…“चुकीबद्दल एक भाऊ म्हणून माफी मागतो”, आधी टिका नंतर माफी, सुप्रिया सुळेंवरील ‘ती’ टिका मिटकरींना भोवली
हेही वाचा…बावनकुळेंसोबत वाद, अन् आता फडणवीसांकडून बच्चू कडूंचं कौतूक, नेमकं शिजतंय तरी काय ?
हेही वाचा…नाशकात अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टॉमॅटोचा वर्षाव, शेतकरी आक्रमक, ताफा अडविण्याचा प्रयत्न