मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणीने सध्या जोर धरलेला आहे. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आजपासून सिडकोला घेराव आंदोलन सुरु केले आहे. राज्य सरकारने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर दुसऱ्या बाजूला बंजारा समाजाच्या वतीने विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे अशी भूमिका घेतली आहे.
हे पण वाचा, अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा, गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड मधील थेट वावर राम शिंदेची डोकेदुखी वाढवणारा
हे पण वाचा “निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
हे पण वाचा नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
दि. बा. पाटील कोण होते ? Who was D B Patil?
दिनकर बाळू पाटील यांनाच नंतरच्या काळात शेतकरी नेते आणि भूमिपुत्र नेते अशी ओळख जनतेने दिली आणि त्यांना दि. बा. पाटील असे संबोधले. दि. बा. पाटील यांचा जन्म उरण तालुक्यातील जासई येथे १३ जानेवारी १९२६ रोजी झाला. ते पेशाने वकील होते तर त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. पनवेलच्या नगराध्यक्षपदापासून ते चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शेतकरी कामगार पक्षातून झाली होती. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने उभारली. त्यांना आंदोलनासाठी अनेक वेळा तुरंगवास देखील झाला होता.
दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती.
हे पण वाचा, “अजित पवार आणि माझी भेट झाली होती मात्र…” राम शिंदे यांनी शब्द फिरवले
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी
शेतकरी कामगार पक्षातून पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. नवी मुंबईच्या विकास कामांत दि. बा. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. सिडकोकडून जेव्हा नवी मुंबईची उभारणी करण्यात आली होती तेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. शेतकऱ्यांच्या या संतापला वाट मोकळी करून देण्यासाठी दि. बा. पाटलांनी मोठा लढा उभारला ज्यामुळे शेतकऱ्यांना जमिनींचा योग्य मोबदला मिळाला. दि. बा. पाटलांनी आपलं आयुष्य भूमिपुत्रांना, शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रतांना न्याय देण्यासाठी वेचलं त्यामुळे इथलचे लोक पहिल्यापासूनच विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्यात यावे म्हणून आग्रही आहेत. १९९८४ साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी दि. बा. पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे जे तत्व प्रस्थापित झाले तेच पुढे महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा लढा उभारणाऱ्या दि. बा. पाटील यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते मानले जाते त्यामुळे विमानतळाला त्यांचं नाव देण्यात यावं म्हणून सर्वच संघटना आणि भूमिपुत्र तसेच प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत.