मुंबई : मागील काही महिन्यापासून कंत्राटी भरतीवरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कंत्राटी भरती प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी संघर्ष यात्राही सुरू केली आहे. यातच आता ३००० हजार सुरक्षारक्षक कंत्राटी नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
महाराष्ट्र पोलिसांच्या सुर७ेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक नेमणार आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का ? शासनाने बृहन्मुंबई पोलिसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम काढण्याची काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही ? मुंबईसारखे अतिसंवेदनशील शहर कंत्राटी सुरक्षाकांच्या हाती देण्यात कोणते शहाणपणे आहे ? पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करणारे तरूण-तरुणी या शासनाला दिसत नाहीत का?त्यांचा हक्क का हिरावून घेतला जातोय? गृहमंत्र्यांनी याचे जनतेला उत्तर दिले पाहिजे. असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
दरम्यान, मुंबई पोलीस व मुंबईच्या सुरक्षेसाठी 3,000 बाऊन्सर अर्थातच कंत्राटी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतलाय! मुळात पोलीस दलात हजारो पदे रिक्त असताना आणि राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक मुलं पोलीस होण्यासाठी जीवाचं रान करत असताना हा निर्णय घेण्याची अशी काय अपरिहार्यता आहे. मुंबई सारखं शहर कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या भरवशावर कसं देताय तुम्ही. हे सरकार युवकांच्या मुळावरच उठलंय! युवकांची स्वप्नं जर बेचिराख होत असतील तर 2024 ला भाजपाची सत्तेत येण्याची स्वप्नं धुळीस मिळवण्याची ताकद या महाराष्ट्रातील युवकांच्या मनगटात आहे, हे विसरू नका! असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलाय.
…तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार ‘बाऊन्सर’ (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का?? शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश… pic.twitter.com/zMEhU2JW3r
— Supriya Sule (@supriya_sule) October 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदाराचा पक्षातच अपमान, बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना झाप झाप झापले
हेही वाचा…राष्ट्रवादीचा गट सत्तेत असल्याचा मलिकांना फायदा, कोर्टाकडून नवाब मलिकांना मोठा दिलासा
हेही वाचा…“भाजपची भांडी घासणाऱ्या बाईने अगोदर..,” राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, चित्रा वाघ यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…सोलापूर काॅंग्रेसमध्ये वादाची मोठी ठिणगी, सुशीलकुमार शिंदेंना मध्यस्थी करावी लागणार, काय आहे वाद ?
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदारांचा पक्षातच अपमान, आता थेट राजीनाम्याची केली मागणी