पुणे : मागील काही दिवसापासून पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला डावलण्यात येत असल्याने भाजपच्या महिला आमदार अश्विनी जगताप काल भर पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांवर संतापल्या होत्या. तसेच या प्रकरणाची तक्रार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करणार असून त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. असा प्रण देखील त्यांनी घेतला. यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. त्यावरून या प्रकरणाची चर्चा आता सर्वदूर सुरू आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
केवळ महिला असल्याने पक्षात दुर्लक्ष केले जात असून पत्रकार परिषदेत एका महिला आमदाराला बसण्यासाठी कडेला खुर्ची दिली जात आहे. अशा पद्धतीने महिलांचा जाहीर अपमान केला जात आहे. असे सांगत अश्विनी जगताप यांचे कट्टर समर्थक राम वाकडकर यांनी थेट भाजपचे सरचिटणीस नामदेव ढाके यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यातच अश्विनी जगताप यांनी नामदेव ढाके यांना कडक शब्दात इशाराही दिला होता अन् त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
हेही वाचा…ललित पाटीलसाठी रूग्णालयात महिला कोण पाठवायचा ? धंगेकरांनी आणखी एक बॉ’म्ब टाकला
पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षात आँल इज नॉट वेल अशीच स्थिती नसल्याने काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना झाप झापलं. चिंचवड, पिंपरी, मावळमधील बुथ प्रमुख फोन उचलत नाही, निम्मे पन्नाप्रमुख गायब आहेत. चिंचवडमध्ये केवळ तीन, पिंपरीत १५ आणि मावळमध्ये १७ लोकांनी नुकतीच झालेली बातचित बघितली. मग कसा व्हायचा महाविजय? असा सवाल बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.
हेही वाचा…“२५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवारांना हुकूमशहा म्हणताहेत”, कोणी केला पलटवार?
दरम्यान, भाजप संघटना कधी लोकप्रतिनींधींना डावलत नाही. अश्विनी जगताप आमदार आहेत. त्यांना कोणी डावलू शकत नाही. डालवण्याचा प्रयत्नही कोणी करणार नाही. कारण लोकप्रतिनिधी आमच्या संघटनेचा गाभा आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. असं बावनकुळे यांनी म्हटलंय. तर आजपासून गटबाजीचे राजकारण संपवून टाका. नेत्यांनी गटबाजी संपवली तरच महाविजय पूर्ण होईल. पिंपरी-चिंचवडमधील एकही मत दुसरीकडे गेले नाही पाहिजे. त्यासाठी १३ महिने दररोज तीन तास काम करावे असे निर्देशही बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिले.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचा गट सत्तेत असल्याचा मलिकांना फायदा, कोर्टाकडून नवाब मलिकांना मोठा दिलासा
हेही वाचा…“भाजपची भांडी घासणाऱ्या बाईने अगोदर..,” राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, चित्रा वाघ यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…सोलापूर काॅंग्रेसमध्ये वादाची मोठी ठिणगी, सुशीलकुमार शिंदेंना मध्यस्थी करावी लागणार, काय आहे वाद ?
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदारांचा पक्षातच अपमान, आता थेट राजीनाम्याची केली मागणी
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान