मुंबई : देवेंद्र फडणवीसांची कॅपसिटी आहे व ती कॅपिसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कॅपसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये? कॅपसिटी असतांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कॅपसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून लायकी काढली हे बरे नाही. फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गटाने म्हटल्याचं सांगत सामनातून फडणवीस आणि शिंदेवर घणाघात केला आहे.
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री होण्यासाठी ताकद द्या,” राज्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी पवार गट सक्रीय
मणिपुरपासून कश्मिरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागांत घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेतच. मोदी-शहा पूर्ण अपयशी ठरले आहेत. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय ? असा सवाल देखील सामानातून करण्यात आला आहे. यावर आता भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…किंग ऑफ पुणे’… लोकसभा निवडणूक आधीच वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी उडवला बार
दरम्यान, आगामी काही काळात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. देवेंद्र फडणवीस लोकसभेला उभे राहून केंद्रात जाणार असल्याच्या मागील काही दिवसापासून चर्चा रंगल्या आहेत. यावरून शिंदे गटातील आमदारांनी देखील फडणवीसांना केंद्रात जावं, अशी भावना व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता सामानातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींना निमंत्रित केले, आता राहुल गांधींना बारामतीत आणले तरीही उपयोग होणार नाही”
हेही वाचा…राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘पॉवर’ खात्याचा पेपर फुटल्याने स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये निराशा..!
हेही वाचा…ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलवली तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“राजकीय द्वेषातून एक रुपयाही दिला जात नाही”, रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
हेही वाचा…“पालकमंत्री पद काढलं तरी चंद्रकांत पाटलांचा पुण्यासाठी जिव्हाळा कायम,” कार्यकर्त्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय