मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये वाढ होतांना दिसत आहे. तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि आता महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिस भरतीचा देखील पेपर फुटला होता. त्यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसने ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…पक्ष फुटीचा राज्यात ‘कुणाला’ फायदा ? लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेत मोठी माहिती समोर
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पॉवर खात्याचा पेपर फुटल्याने स्पर्धा परिक्षा उमेदवारांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. मुंबई पोलीस भरतीचादेखील पेपर फुटला होता. योगायोग म्हणजे गृह खातेसुद्धा उपमुख्यमंत्र्यांकडेच आहे. वर्षानुवर्ष यांसारख्या स्पर्धा परिक्षांसाठी अनेकजण तयारी करीत असतात. असे असताना वारंवार पेपरफुटी सारखे प्रकार घडत असल्याने अनेक तरुणांचे खच्चीकरण होऊन त्यांचे आयुष्य टांगणीला लागले आहे; त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होत आहे. या संपूर्ण प्रकाराची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत त्याच्या मुळाशी जाऊन उच्च स्तरीय चौकशी केली पाहिजे व दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे. अशी मागणी देखील राष्ट्रवादी काॅंग्रेसने केली आहे.
हेही वाचा…भाजप-शिंदे- अजित पवारांविरोधात ठाकरे मावळमध्ये लढणार, भाजपचा ‘हा’ जुना गडी ठाकरे मैदानात उतरवणार
दरम्यान, पेपर फुट प्रकरण, कंत्राट भरती आणि इतर मुद्दे घेऊन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पुणे ते नागपूर अशी युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. या यात्रेदरम्यान रोहित पवार दसऱ्याच्या दिवसापासून पुणे ते नागपूर ८२० किमी पायी चालणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलवली तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“राजकीय द्वेषातून एक रुपयाही दिला जात नाही”, रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
हेही वाचा…“पालकमंत्री पद काढलं तरी चंद्रकांत पाटलांचा पुण्यासाठी जिव्हाळा कायम,” कार्यकर्त्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री होण्यासाठी ताकद द्या,” राज्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी पवार गट सक्रीय
हेही वाचा…किंग ऑफ पुणे’… लोकसभा निवडणूक आधीच वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी उडवला बार