मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील ईडी यंत्रणेचा ससेमिरा लागला आहे. महाविकास आघाडीतील विद्यमान मंत्री, आमदार, खासदार, त्यांचे निकटवर्तीय अशा सर्वांवरच ईडीकडून छापेमारी, चौकश्या सुरु आहे.
मोठी बातमी: नितेश राणेंना मोठा दिलासा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
मागील दोन आठवड्यांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि ईडीवर जोरदार टीका केली होती. आता संजय राऊत यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना एक पत्र लिहले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक पत्र लिहल्यानंतर ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी सरकारी यंत्रणा आणि भाजपला इशारा दिला होता की दादागिरी करायची नाही. मुंबईचा दादा शिवसेना आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर काहीसे वाद देखील भाजप आणि शिवसेनेत पाहायला मिळाले होते.
आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील याच मुद्द्यावरून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. नारायण राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की संजय राऊत हे जर म्हणत असतील की ते मुंबईचे दादा आहेत तर ते फक्त मातोश्रीपुरतेच मर्यादित आहेत. गुन्हे करायचे आणि त्यामध्ये मी नव्हतो असं म्हणायची वाईट वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या द्यायचे दिवस आता गेले आहेत असं देखील नारायन राणे यांनी संजय राऊत यांना म्हटलं आहे. तुमची जागा आता बाहेर नसून ती आत आहे त्यामुळे तुमच्या धमक्यांना भाजपवाले भीक घालणार नाही असा टोला देखील राणेंनी राऊतांना मारला आहे.
Read also:
- ‘लांडेवाडीच्या घाटात या’ मग बघू कोण कोण बसतंय घोडीवर? शिवाजीराव आढळरावांचे कोल्हेंना खुले आव्हान
- मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमणार; राज्य सरकारचा निर्णय
- नितेश राणेंची प्रकृती आणखी बिघडली; संध्याकाळी होणार सिटी अँजिओग्राफी
- अण्णा हजारेन बेमुदत उपोषणाच अस्त्र उगारलं; ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात उतरणार मैदानात
- सिंह कधी गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही; संजय राउतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार