पुणे : मागील काही दिवसांपूर्वी शिरूर-आंबेगाव लोकसभा मतदारसंघात घेतल्या जाणाऱ्या दोन बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आल्या होत्या. यामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी बैलगाडा शर्यत रद्द झाल्यामुळे शिरूरचे सध्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर जहरी टीका केली होती. यामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ऐनवेळेला शर्यत रद्द करा असा आदेश काढल्याने नाराजी व्यक्त केली होती.
माझा राजकीय खुन करण्याचा प्रयत्न; मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
आता पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि खासदार अमोल कोल्हे हे बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून आमने सामने ठाकले आहेत. लांडेवाडीत शिवाजीराव आढळराव यांच्यावतीने एक शर्यत भरवण्यात येणार आहे तर दुसरीकडे नारायणगावमध्ये अमोल कोल्हे आणि सुनील शेळके यांच्या वतीने शर्यत आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही शर्यत या एकाच वेळी होणार असल्याने राजकारण चांगलेच तापणार आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून तीन वेळा बंदी उठवली होती. मात्र लोकसभेच्या वेळी काहींनी लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करून दिले आहेत. मी बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासाठी काय केले हे सर्वांना माहित आहे.
मोठी बातमी: नितेश राणेंना मोठा दिलासा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
लोकसभा निवडणूकीवेळी आपण घोडीवर बसू वगैरे वगैरे अशी काही भाषणे करण्यात आली, आता कुठय तुमची घोडी? त्यांना खरच घोडीवर बसायचच असेल तर ११ आणि १२ फेब्रुवारीला लांडेवाडीच्या घाटात या मग बघू कोण बसत घोडीवर, असे थेट आव्हान शिवसेनेचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेचे विद्यमान खासदार डॅा. अमोल कोल्हेंना दिले आहे. शिवाजीराव आढळराव पाटलांनी आयोजित केलेली शर्यत ही ११ आणि १२ फेब्रुवारीला लांडेवाडीच्या घाटात होणार आहे. याच स्पर्धेसंदर्भात ते बोलत असतांना त्यांनी खासदार अमोल कोल्हेंना डिवचले असून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी आपणच जास्त प्रयत्न केल्याचे सांगितले आहे.
Read also:
- मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमणार; राज्य सरकारचा निर्णय
- नितेश राणेंची प्रकृती आणखी बिघडली; संध्याकाळी होणार सिटी अँजिओग्राफी
- अण्णा हजारेन बेमुदत उपोषणाच अस्त्र उगारलं; ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात उतरणार मैदानात
- सिंह कधी गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही; संजय राउतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
- अमरावतीत महापालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले